My Blog List

Friday, June 19, 2015

18/06/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 18/06/2015 बापूंचे प्रवचन

हे जातवेदा..आमच्यासाठी आवाहन करून घेऊन ये..जातवेदोमावह..  लोपामुद्रा आवाहन जातवेदाला करते..जातवेद  हे नाव त्रिविक्रमाचे आहे..ती त्याला आवाहन करते कि "हे त्रिविक्रमा, तु लक्ष्मीला घेऊन ये"..जातवेदालाच का..त्रिविक्रमालाच का आवाहन करते? शिवा ला, विष्णू, किरातरूद्राला का नाही? 
जातवेदाचा अर्थ..जो वेदांना जाणतो..पुरेपुर जाणतो..त्याच्यापासुन वेद उत्पन्न झाले आणि वेदांमुळे तो आला..
लोपामुद्रेने त्यालाच आवाहन का केले? चार ही वेदांमधे..ऋषींचे प्रमुख ध्येय काय होतं..'सामान्य मनुष्य' हेच त्यांचं ध्येय..सामान्य मनुष्याचं जीवन  आणि त्यांच्या जिवनात त्यांचा अभ्युदय..प्रापंचिक, शैक्षणिक पासुन ते पारमार्थिक प्रगती..ह्या ऋषींना ह्याची काळजी होती..हे महर्षी होते..पण तरी त्यांचं प्रेम  सामान्य माणसाबद्दल होतं..म्हणुन सामान्य मनुष्यांना कळू शकणार नाही, असं त्यांनी कधीच लिहिलं नाही..ह्या ऋषींना जे काही दिसलं..ऋषींना ब्रम्हर्षी पद प्राप्त झाल्यानंतर अखिल कल्याणासाठी चिंतन करीत असताना जे ज्ञानाचं भंडार त्यांच्यासमोर उघडं केलं..ते ज्ञान..म्हणजे शब्द नव्हे नुसते...जे आहे ते तसंच्या तसं सांगणे..जे जसं आहे त्यानुसार परमेश्वराने निर्मिलेलं आहे, त्याचा परमेश्वरी नियमानुसार उपयोग व्हावा, तेच ज्ञान....
ज्ञान म्हणजे, जो काही विषय आहे..मग ते काही असो..ते का निर्मिलं तिथपासुन ते जाणुन घेऊन त्याचा उचित वापर संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, हे शिकणं; म्हणजे ज्ञान..
वेदांमधे प्रत्येक सुक्तात कुठल्या न कुठल्या देवतेचं आहे..
ह्यातली प्रत्येक ऋचा,  मानव कल्याणाच्या अत्यंत पवित्र भावनेने भरलेली आहे..ह्यात लोपामुद्रा ही प्रमुख आहे..
लोपामुद्रा एक दिवस रस्त्याने चालली होती..तिच्यासमोर मुंगळ्यांची रांग चालली होती.. ते मुंगळे उन्हात चालत होते..मग तिने मुंगळ्यांच्या पायाला चटके बसतात कि नाही हे बघितलं..मग का बसत नाहीत, हे शोधुन काढलं..अन् ते शोधता शोधता तिला चटका बसणं नाहीसं झालं..
जर ती मुंगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी पण तयार आहे..तर आपण सामान्य माणसांनी पण तयार असलंच पाहिजे..तो त्रिविक्रम एकच एक असा आहे, जो वेदांना जाणतो..
म्हणुन तो 'जातवेदा'..
आदिमातेने शेकडो ऋषींना ज्ञान प्रगत केले आणि ते प्रगट होत असताना त्याच्या साक्षीसाठी त्रिविक्रम होता..
तीन पातळ्या.. ज्ञानाच्या...
'बुध्दीची'
'मनाची'.. ज्ञान झालं की ते 'पटणं' आवश्यक असतं..
'क्रियेची'.. मनाला पटलं तरी कृतीच्या पातळीवर यावं लागतं..
आणि ह्या तिन्ही पातळीवर जो कार्य करतो, तो त्रिविक्रम.. आणि म्हणुन वेद आले अन् मग जो जाणता झाला नाही; तर वेद येत असतानाच तो जाणत होता..
ह्या आदिमातेने हे वेद प्रथम त्रिविक्रमाकडे सोपविले.. मग त्याने तीन पावलं एकाच वेळेस टाकत स्थिर केले.. लोपामुद्रा म्हणजे जिला 'ब्रम्ह' म्हणजे काय? ते कळलेलं आहे.. आणि ती ते अनुभवते.. तिच्या जीवनात जरा ही अपवित्रता नाही.. ती ब्रम्हवादिनी.. स्वप्नात ही जी असत्य बोलत नाही...तिला माहित आहे की, त्रिविक्रमानेच सर्वांना वेद दिले..
जो ब्रम्हर्षींना देऊ शकतो ज्ञान तीन ही पातळीवर. मग सामान्य माणसा साठी का नाही...

त्रिविक्रमा शिवाय जीवनामध्ये कुठलं ही सौंदर्य प्राप्त होऊ शकत नाही..जीवनातली कुठली ही गोष्टं मधुर, सुंदर बनवायची असेल तर त्यासाठी तो 'त्रिविक्रम' अत्यंत आवश्यक आहे..

जीवनामधे.. आपण एका कल्पनेत राहतो..आम्हाला सगळं 'परफेक्ट' लागतं.. कोणी ही मानव 'परफेक्ट' असुच शकत नाही.. ते फक्त मोठी आई अन् तिचा पुत्र...
परफेक्शन म्हणजे 'क्षितीज'.. परफेक्शन... म्हणजे जरा ही चुक नसणं.. अचुक.. आणि असं असुच शकत नाही.. पण म्हणजे सर्वच्या सर्व चुक आहे; अशात जगायचं नाही..
Perfection is impossible... हे लबाड बुध्दीमान लोकांनी न्युनगंड उत्पन्न करण्यासाठी बोलतात..  मला perfect नाही तर आज आहे त्यापेक्षा ऊद्या चांगलं बनवायचंय..
जो 'त्रिविक्रमाचा, ह्या आदिमातेचा' झाला; तो प्रत्येक जण प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा अधिक प्रगत झाला पाहिजे.. त्याच्या स्थुल, प्राणमय अन् मनोमय देहात 'त्याची' तीन पावलं उमटत असतात.. तो दररोज लक्ष्मी ला आमच्यासाठी आवाहन करत असतो... म्हणुन ही लोपामुद्रा 'जातवेदाला' आवाहन करते, की लक्ष्मी ला तू घेऊन ये...
आपल्याकडे मोठी capacity (क्षमता) आहे.. आपल्याला प्रार्थना करता येते...प्रार्थना, म्हणजे पुर्ण श्रध्देने 'त्याला' हाक मारणं... ही capacity (क्षमता) माझ्याकडे आहे.. ती मी वापरतो का?
लोपामुद्रा वापरते...
त्रिविक्रम आणि त्याची माता अगदी मुंगी पासुन प्रत्येक मानवाची प्रार्थना ऐकत असतात...
आणि ऐकुन action (कार्यवाही) पण घेतात.. पण ते आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी मला connection (संपर्क) निर्माण करावं लागतं.. आणि त्यासाठी विश्वास पाहिजे...एक विश्वास...आपला विश्वास जर 70% आहे तर 700 पट जास्त येईल.. कुठली ही गोष्टं आपण मागितली आणि जर ती अनुचित नसेल तर ती त्याच क्षणी आलेली असते...पण मला प्रार्थना करता आली पाहिजे...आपल्या शब्दांमधे आपलं म्हणणं, आपल्याला मांडता आलंच पाहिजे..
प्रार्थना म्हणजे नुसतं 'मागणं' नव्हे..
प्रार्थनेचे दोन भाग आहेत..
आरतीमध्ये पहिल्यांदा त्या त्या देवतांवरचा विश्वास आहे...
त्याला म्हणतात, 'स्तुती प्रार्थना'
दुर्गे दुर्घट भारी..... हे आदिमाते, तुझ्या शिवाय ह्या संसारात प्रत्येक गोष्टं कठीण अन् दु:खदायक होऊन बसते..
अनाथ नाथे अंबे...
जो जो म्हणुन कोणी अनाथ आहे त्याला तू सनाथ करणारी आहेस...
अंबे म्हणजे माझी आई...माझी प्रिय आई...हे तीन शब्द एकत्र म्हणजे 'अंबा'... अनाथाची नाथ आहेस तु..मी अनाथ असू शकत नाही..कारण तु माझी प्रिय आई आहेस..
करूणा विस्तारी..हे आदिमाते, तुझी करूणा एवढी अपरंपार आहे..मी खुप लांब ऊभा आहे तुझ्यापासुन..माझ्यात कुठलीही क्षमता नसेल, पण तुझ्यात आहे...तु तुझ्या करूणेचा विस्तार कर..मी आहे; तिथपर्यंत..
मागायचं, कसं मागायचं..आपण मागायला पण शिकलं पाहिजे.. आपल्याला परमेश्वराने 'प्रार्थना' ही शक्ती उपजतच दिली आहे..मानव पहिली प्रार्थना..पहिली 'हाक' आईलाच मारतो..ही 'जगताची आई' आहे..तिला हाक मारण्याशिवाय आपल्याला पर्याय असुच शकत नाही..जसं, त्या बालकाची हाक आई ला कळतेच नं! सामान्य आई ला कळते; तर मग त्या जगदंबेला का कळणार नाही..'ती' प्रार्थना ऐकत असलीच पाहिजे..

दुसरं Proof (पुरावा)
शांत कुठे ही बसा... अन् विचार करा, कि आपण किती चुका केल्या लहानपणापासुन... आणि तरी परमेश्वराने आपल्याला किती दिलं...
म्हणजेच माझी आई लक्ष देत असते..
ती मला सहाय्य देतंच आहे..त्रिविक्रम मला प्रत्येक गोष्टीत सहाय्य करतोच आहे..

तिसरं Proof (पुरावा)
रोज रात्री 10 minutes be still n silent (10 मिनिटे स्थिर न शांत बसा)..आणि शांती अनुभवायची.. हळू हळू तुमच्या मनाला 'शांती' (peace) मिळायला लागेल...
जी उत्तरं तुम्हाला कधी सापडली नव्हती..ती, त्या 10 मिनिटात मिळू लागतील..'ते दोघे'..त्रिविक्रम आणि मोठी आई तुमच्या शांततेचा आवाज 'ऐकतात'
जर ते शांततेचा आवाज ऐकू शकतात, तर बोलण्याचा नक्कीच ऐकतात..जर विचार कुठला आला, तर म्हणायचं; "हा विचार माझा नाही" त्या 10 मिनिटातले 2 सेकंद सुध्दा तुम्हाला आदिमातेशी जोडून देतील..आणि 'हेच ते आवाहन'  जातवेदोमावह:  ...
रात्रीची 10 मिनिटं शांत बसा..शरीर आधी स्थिर अन् मन शांत.. atleast (कमीत-कमी) शरीर तरी स्थिर करूया.. मुद्दाम विचार करायचा नाही..
फक्त आधी बसताना म्हणा..
हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
आणि झाल्यावर म्हणायचं, "जय जगदंब जय दुर्गे"..  जेंव्हा मनुष्य, शरीर स्थिर करतो; तेंव्हा हा त्रिविक्रम त्याची 'तीन पावलं' उचलतोच.  600 सेकंदा मधे कमीत कमी 3 सेकंद तरी तुमचं connection (संपर्क) आदिमातेशी जोडलं जातं..आणि जशी सवय होत जाते तसा तो 3 सेकंदाचा काळ वाढायला लागतो..
उत्साहवर्धक द्रव्य जे लागतं..ते गुह्यसुक्तम् मधुन मिळतं..
10 मिनिटं शांत बसा कि तो त्रिविक्रम तुमचं आयुष्य जाणण्यासाठी आहे. जे जे आवश्यक आहे..ते आणुन देईल..
लक्ष्मी म्हणजे सर्व प्रकारची सौंदर्य-शक्ती..हे सर्व पुरवणारी लक्ष्मी आहे आणि सर्व संपन्नतेला घेऊन येणारा हा त्रिविक्रम आहे..
म्हणुन लोपामुद्रेने म्हटलं...
जातवेदोमावह..
रोज रात्री 10 मिनिटं बसायचं..आधी बसताना म्हणा..हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
शांत बसायचं आहे.. त्या 10 मिनिटात प्रयत्न करूच नका..कुठला ही विचार जर माझ्या मनात आला, तर समजायचं कि तो विचार माझा नव्हता.. अन् झाल्यावर "जय जगदंब जय दुर्गे" म्हणायचं..
रात्री झोपताना रामरक्षा म्हणा..म्हणताना झोप लागली तर तुमचा बाप ती पुर्ण करेल..
आपला बाप अन् आई जे काही करतात ते मुलांसाठी कधीच उपकार नसतात..

म्हणुन ती लोपामुद्रा म्हणते..
हे त्रिविक्रमा, तू त्या लक्ष्मीला माझ्या शेतात, माझ्या कुळात सर्व ठिकाणी येण्यासाठी आवाहन कर अन् घेऊन ये! आणि हा हट्ट फक्त ती बापाकडेच करते.. आपली आजी एवढी असताना, आपला बाप असताना आपल्याला काळजी कसली..आपल्याला काळजी नाही..
ह्या विश्वातील समग्र ज्ञान, म्हणजेच प्रत्येक शुभ गोष्टींचा प्रारंभ..वेद मंत्रानेच होतो..त्रिविक्रम म्हणजे जे जे काही शुभ मंगलमय ते सर्वच्या सर्व जो निर्माण करतो आणि अमंगल दुर करतो, तो त्रिविक्रम..अन् तो जातवेदा..

"ॐ श्री जातवेदाय नम:" 5 वेळा जप करा..

आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी कधी म्हणायचं..
दर महिन्याच्या 18 तारखेला जो कोणी 5 वेळा हा जप म्हणेल, त्याला आजसारखंच connection (संपर्क) जोडला जाईल..
ज्या दिवशी लक्ष्मीपुजन करू..श्रीसुक्तम् म्हणता आलं तर चांगलंच.. पण हा मंत्र 5 वेळा म्हणुन सांगू शकता! आपल्या भाषेत सांगायचं..की "माझ्याकडे पुजनाला घेऊन ये..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत...

Friday, June 5, 2015

4/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 4/6/2015      बापूंचे प्रवचन

उपनिषद वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर मणिद्वीपचं चित्र येतं..मग तुम्हाला वाटतं कि नाही, आपण त्या मणिद्विपात बसलो आहोत..माझी लायकी आहे कि नाही, हे विचार न करता; आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत, अशी कल्पना करायला पाहिजे..आणि जेंव्हा जेंव्हा आपण तिच्या प्रतिमेसमोर बसतो; तेंव्हा असाच भाव असला पाहिजे की, "आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत"
चंद्रां हिरण्यमयीं
लोपामुद्रा म्हणते की ज्याच्या आजुबाजुला असलेला प्रकाश म्हणजे सुर्याप्रमाणे तो प्रकाश तीव्र नसतो, तर तो प्रकाश; सौम्यच आहे..
पण त्याच्याही पलिकडे जाऊन लोपामुद्राला, काहीतरी सांगायचे आहे..

लोपामुद्रेचा मंत्र, 15 अक्षरांचा आहे..आणि 16 वे अक्षर हे 'लक्ष्मी किंवा सद् गुरूच असतो..

15 अक्षरं, म्हणजे 'बीज' आहेत ज्यांना नित्य म्हणतात..आणि जेंव्हा ह्या 15 नित्य पुर्ण झाली; की मग ती "सोळावी, म्हणजे 'ती' आई येते"

चंद्राच्या कला 15 आहेत आणि 16 वी कला म्हणजे अमावस्या आहे.आईच्या मंत्राची कला '16' वी, ही अमावस्या नाही..

आमची इच्छा काय असते? तर ही लक्ष्मी, अनपगामिनीम् म्हणजे; आमच्यापासुन कधीही दुर न जाणारी असावी..

अमावस्येच्या दुस-या दिवशी चंद्राची कला कमीच दिसते. आणि मग 15 दिवसांनंतर ती पुर्ण दिसुन येते.

जशी चंद्राची कला कमी होत जाते तसं त्याच्या आकाशातील अनेक तारे चमकायला लागतात..आणि अमावस्येच्या रात्री खुप तारे असतात..

आम्हाला लक्ष्मी कशी हवी असते? चुटकी वाजवली कि, ती यायला हवी म्हणजे आपल्याला कमी श्रमात आणि कमी वेळेत लक्ष्मी हवी असते पण तो लक्ष्मीचा मार्ग नाहीच!

आपल्याला लक्ष्मी, 'अनपगामिनिम्' हवी असेल तर चंद्राप्रमाणे तिला स्विकारायला हवं..
आपल्याला पैसा चटकन हवा असतो..मी गेली 16 वर्ष सांगतोय, की कोणत्याही स्किम मधे पैसे गुंतवू नका.. पण तरी आपल्या मोहामुळे आपल्या डोळ्यांवर पडदा पडतो..
आणि मग '20 वर्षांनंतर जागा नाही मिळाली' तर मग देवाला शिव्या घालतो..
झटपट पैसा मिळवण्याची स्किम तुमच्याकडे आली तर 'त्यांना सरळ हात जोडायचे..कारण त्यात success (यश) कधीच नसतं..

माणसात, 'ठग' अनेक जण असतात आणि अश्यांना आपण का बळी पडतो? अश्या ठगांना बळी पडू नका..
मग इथे imp (महत्वाचे) काय आहे? तर 'चंद्राम्' म्हणजे step wise progression. (पायरी-पायरी ने प्रगती)

ज्या व्यक्तीने बँकेकडून Loan (कर्ज) घेतलंय आणि त्याने वेळच्या वेळी ते loan (कर्ज) फेडलंय, तर मग ते बँक वाले स्वत: येऊन त्याचे काम घरी करतात; कारण त्याचा business (व्यवसाय) नीट चालु आहे.

7 दिवसात इंग्लिश शिका, असं कधीच शक्य नाही..spoken & written language (बोलणं आणि लिहीण्याचं केंद्र एकच आहे..कोणी ही कितीही हुश्शार असलं; तरी त्याला इंग्लीश चांगल्या प्रकारे येण्यासाठी त्याला कमीत कमी 6 महिने लागतातच!
आम्ही ह्याच्या मागे जातो आणि आपल्याला 'अनपगामिनी' हवी असते, पण येतं कोण? तर त्या लक्ष्मी ची बहिण अवदसा येते..आणि ती चुकीच्या मार्गाने पैसे आणते..

मीना वहिनीं नी सांगितलंय की

आता कैसी अमावस्या.. नित्य अनिरूध्द पोर्णिमा..

पण हे कधी घडेल? जेंव्हा आपण अनिरूध्दाचे होऊ तेंव्हाच..
आपण cheating (लबाडी) करायला लागलो; की देव cheating (लबाडी) करत नाही, तर देव आपल्यापासुन अलिप्त होतो..

त्याच्याशी खोटं बोलू नका आणि त्याच्या'विषयी' खोटं बोलू नका..

साई चरित्रामधे आपण दामू अण्णाची गोष्टं पहातो..
त्यात शामा, बाबांना दामू अण्णाचं पत्र वाचुन दाखवतो; तर बाबा म्हणतात की आपल्याला नाही करायचं हे..पण शाम्याच्या मनात बाबांना कमीशन (पाती) देण्याचं असतं!!..
काही काळानंतर त्यांचा business partner (व्यवसाय भागीदार) धुळीला मिळतो पण शामा चं नुकसान नाही होत!

'चंद्राम्' ह्याचा मुळ अर्थ आहे 'तू जे काही ह्या सृष्टीमधे चांगलं होतं, ते म्हणजे ऋत'..म्हणजे जी आपला ऋत maintain (व्यवस्थित) करते ती, जी आपला श्वास maintain (नीट) करते ती, म्हणजे 'चंद्राम्'...

पाऊस पडून गेला, तर जमीन लगेच कोरडी होते का? नाही नं..काही वेळ जायलाच पाहिजे..हा त्या निसर्गाचा नियम राखलाच पाहिजे..

तुमच्या घरात दागिने असतील तर ते तुम्ही लॉकर मधे नेऊन ठेवता..तुमच्यासाठी दागिने अदृष्य होतात; पण ते सुरक्षित असतात..

हिचं अस्तित्व चंद्रासारखं आहे..जे आपल्याला योग्य आहे, ते-ते ती देणार आहे..पण आपला धीर रहात नाही..
मग आपण इथे त्या त्रिविक्रमाला आवाहन करायचं आहे..

आणि ती लक्ष्मी क्रमशील मार्गाने येणार आहे..कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच..क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे..

केवळ एक माणुस श्रीमंत झाला, तर मत्सराने त्या व्यक्तिला कधीच असं म्हणायचं नाही कि, "त्याने चुकीच्या मार्गाने मिळवला असणार"..असा दोष देऊ नका..कारण जर त्याने तो पैसा चांगल्या मार्गाने मिळवला असेल तर तो दोष त्या माणसाला नाही लागत तर त्या लक्ष्मी ला लागतो..

तेंव्हा असं म्हणा, कि "देवाला माहित"

तेंव्हा जय जगदंब जय दुर्गे असं म्हणुन सोडून द्यायचं..

कारण ते करताना तुम्ही लक्ष्मी ला दोष देत असता..आणि तिला दिलेला दोष, त्या महाविष्णूला आवडत नाही..कारण जिथे महाविष्णू नसेल, तिथे ती लक्ष्मी नसेलच..

मॅगी खाल्ल्याने लहान मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागत..50 वर्ष वय असलेल्या माणसाने खाल्ली तर त्यांना सुध्दा बराच त्रास उदभवतो..मग आपण का खातो?? फक्त चव चांगली आहे म्हणुन??
इथे आहेत, त्यातल्या 172 जणांनी मॅगी खाल्ली आहे, मग आता तरी ती खाणं सोडा..
हे असं का घडलं??
1) बायका, मुलांना जेवण बनवुन द्यायचा आळस
     करून त्या मुलांना मॅगी देतात
2) जेवणाच्या वेळेसच ह्या मॅगीच्या ad (जाहिराती)
     लागतात..

देवाने तुम्हा स्त्रियांना वरदान दिलेय..मातृत्वाचं..मग ते चांगलंच आहे नं..त्याचा विचार करा..

मग कधी बायको ला बरं नाही, म्हणुन नव-याने त्या दिवशी चहा दिला तर तिला आवडेल नं..पुरूषांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्या बाजुने विचार केला पाहिजे..

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा आणि परमशिव आणि प्रजापती ब्रम्हा वेगळे नाहीत तर एकच आहेत..आणि बळकट मन तर बळकट शरीर...

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा ह्या एकच आहेत..
आपल्याला आपल्या आयुष्यात लक्ष्मी हवीय, अधिक पैसा मिळवणे चांगलंच आहे पण तो 'क्रमाने' मिळवा, श्रम करून मिळवा..

थोड्या वेळेत खुप पैसा मिळवणे, जास्त टिकणारे नसते..
मी माझ्या आईला cheat (फसवलं) केलं तर तिला कळणार नाही! पण तसं नाही; त्या 'मोठ्या आईला' आणि तिच्या 'पुत्राला' कळतंच..

प्रत्येकाच्या मनाचं connection (जोडणी) येऊन ते त्या परमात्म्याशी जोडलंच जातं..

ईश्वराचा धाक असलाच पाहिजे..
अलक्ष्मी, नेहमी दु:खच घेऊन येते..ह्या विश्वावर राज्य, फक्त त्या आदिमातेचंच आहे..
आपण जर ह्या चंद्राच्या मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला अपेक्षित नसलेलं सुध्दा आपल्याला चांगलंच मिळेल..

- एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा..

- माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते..

गुरूक्षेत्रम मंत्र, हा आपल्याला नेहमीच आधार देणारा आहे..आणि हा गुरूक्षेत्रम मंत्र म्हणजे त्या त्रिविक्रमाचं मंत्रमय स्वरूप आहे..

त्यातला तो 'अनिरूध्द' म्हणजे तो 'श्रीविद्येचा पुत्र म्हणजे त्रिविक्रम'

हरि ॐ

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत...

Wednesday, June 3, 2015

बापूंचे प्रवचन 28/05/2015

हरि ॐ  बापूंचे प्रवचन     दिनांक 28/05/2015

आज आत्ता जे योगिंद्रसिंह कडून श्रीसुक्तम् ऐकलं तर मला आज लहानपणीची आठवण झाली. तेंव्हा नवरात्री मधे सगळ्या स्त्रिया नऊवारी साड्या, आणि पूरूष पगड्या घालायचे!  सर्वजण हे श्रीसुक्तम् बोलायचे..

आधी दिवाळीला एवढं महत्व नव्हतं, तेवढं नवरात्रीला खुप महत्व होतं..तेंव्हा सगळी मंडळी एकत्र येऊन जे प्रेम व्यक्त करायचे, ते वेगळं होतं..तेंव्हा जात वगैरे काहीच मानलं जात नव्हतं..सर्वजण आरती attend करायचे..

मग ते दिवस परत आले पाहिजेत..आता आपण गरबा खेळायला आणि जास्त काही बघायला जातो. किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात जातो..

नवरात्री म्हणजे काय हे 'उपनिषद' मधुन आपण शिकलो! कि हे नऊ दिवस किती important (महत्वाचे) आहेत, हे आपल्याला कळलं! आम्हाला श्रीसुक्तम् म्हणता येतं तर आपण म्हणू किंवा 'दुर्गे दुर्घट भारी' म्हटली, तरी काय हरकत आहे?/
प्रेमाने आपल्याला रोज म्हणता येईल नं??

'त्या आईचं स्वागत करायला शिका..त्यासाठी घरात 'घट' हवाच, असं नाही. पण आपल्याला कळलं पाहिजे..कि ह्या नऊ दिवसात आईचा वावर असतोच! आणि 'तिने सांगितलंय नं' कि 'ती येते' म्हणजे 'ती येतेच येते..आणि ती स्पर्श करतेच!!'

स्पर्श करणे, म्हणजे 'ती मनाला स्पर्श करणं' (important) महत्वाचे आहे..आणि हे, महालक्ष्मी आणि लक्ष्मीचे सुक्तम् आहे; मनाला त्याचा effect (परिणाम) होतो..अर्थ कळला नाही, तरीही आपल्या मनाला ह्या सुक्तम् चा स्पर्श होतोच!

ऊदाहरणार्थ; एका व्यक्तीला जर संस्कृत मधे शिवी सांगुन 'मोठ्या आईला मंत्र म्हणुन 'म्हण' असं सांगितलं; तर त्या व्यक्तिला त्याच्या 'भावा'नुसार फळ मिळणार..आणि आपण त्याला चुकीचं सांगितलं, म्हणुन आपल्याला त्याच्या 100 ऊलट फरक पडणार आहे..

दुस-याच्या मुलाला 100/100 मिळाले आणि आपल्या मुलाला 50/100 मिळाले तरी आपल्याच मुलावर प्रेम असतंच असतं..आणि ते आपल्या आईचं असायलाच पाहिजे..आणि हिच मानवाची साधी गोष्टं मोठ्या आईपर्यंत नेली पाहिजे.. मोठ्या आईला सगळेच जवळ आहेत..
मोठ्या आईशी communicate (संपर्क/संवाद) करताना आपण नेहमी शांत राहून एक लक्षात ठेवलं पाहिजे, की "हिच्या समोर मी honest च (प्रामाणिकच) राहणार आहे..

Honest (प्रामाणिक) राहणं म्हणजे...
     1)  कान पकडणे नाही
     2)  आपल्या चुकांचा पाढा वाचणे तर नाहीच

मग असं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या साठी आई जे करते, ते चांगलंच करते, हा विश्वास हवा..

आपल्या आईवर पुर्ण विश्वास ठेवा..जे घडलं  त्या दिवशी तिला सांगायचं कि "आई आज चुकलं..आणि मनात आपल्या स्वत:ला बदलायला सुरू करायचं..

तिला आणि तिच्या पुत्राला काहीच कळत नाही; असं जेंव्हा मनात येईल, तर समजायचं की 'आपल्या अध:पतना ला सुरूवात होतेय..आणि त्यानंतर मग आपलं life (जीवन) 'नियमां'मध्ये बांधलं जाईल आणि मग त्रिविक्रम आपल्याला कधीच आयुष्यामधे मदत करायला येणार नाही..

समोरची मुर्ती बोलत नसेल; मान्य आहे..पण ती समोरची 'मुर्ती आहे' हा भावच चुकीचा आहे.. "ती तिच आहे" हा आपला भाव असलाच पाहिजे..

नवरात्री मधे आम्ही आरती कधी करू? किती ही वेळा करा..जशी जमेल तशी करा! पण प्रेमाने करा..

आरतीच्या तबकात नुसतं निरांजन ठेवुन आरती करू नका..
त्यात कमीत कमी 2-4 फुलं किंवा एक तुळशीचं पान नक्की ठेवा..कारण हा संकेत त्या लोपामुद्राने आणि अगस्त्य ऋषींनी सांगितला आहे..

आपल्या धर्मामध्ये एक important (महत्वाची) गोष्ट सांगितली आहे..आपल्याकडे 'राजोपचार पुजना'च्या वेळेला काही नसेल, तर अक्षता वहा..ते ही नसेल तर एक पान वहा आणि जर ते ही नसेल, तर पाणी वहा.. आई; जे हवं ते नक्की घेईल!!

पण आपण मोठे महाग कपडे घालून बसू आणि आईला काही देणार नाही; असं चालणार नाही..

मग अश्विन महिन्यात 'दुर्गे दुर्घट भारी' आरती म्हणा.

जेंव्हा आई बाळाला जन्म देते तेंव्हा आई बाळाचं स्वागत करते कि बाळ आईचं स्वागत करते??

बाळ बाहेर येताना आईला ज्या वेदना होतात तेंव्हा मग त्याचा प्रतिसाद म्हणुन ते बाळ; रडून आईचं स्वागत करतं!

ही, सुवर्णाचे आणि चांदीचे अलंकार धारण करते..

मग सगळ्या जगाची सम्राज्ञी आहे, तर ती चांदीचे अलंकार का धारण करते? फक्त सोन्याचे केले पाहिजेत नं??

सुवर्ण आणि रौप्य ह्यातुन आपल्याला, लोपामुद्रा काय सांगते? तर आईला सोनं आणि चांदी मधे काहीच फरक नाही..तिला सुवर्णा बरोबर रौप्य ही प्रिय आहे..म्हणजे श्रीमंता बरोबर गरीब ही आईला प्रिय आहे..रूपवान ही प्रिय आणि कुरूप ही तेवढाच प्रिय आहे..

आयुर्वेदामधे, "सुवर्णात" सगळ्या चांगल्या गोष्टी देण्याचं सामर्थ्य आहे..

आधीच्या काळात कोणी बरं नसेल, की त्या व्यक्तिला "हेम गर्भाची मात्रा" द्यायचे..ती दिल्या शिवाय कोणाला ही 'मृत' म्हटले जायचे नाही..

हे सुवर्ण, मनुष्याच्या देहातील पेशींशी जोडलेलं आहे.. मनुष्याच्या शरीरात; जे जे चांगलं घडुन आणायला हवं ते सर्व सुवर्ण करू शकतं..आणि काही ठिकाणी तो effect (परिणाम) पोहोचायला कमी पडत असेल, तर रौप्य काम करतं!

मग आई ने हे का परिधान केलं??

"त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं"

सुवर्ण - त्रातारं चं काम करते..

आणि रौप्य - अवितारं इन्द्रं चं काम करते..

ह्यातुन आई काय दाखवते, तर हे माझे अलंकार आहेत..पण लोपामुद्रा काय सांगतेय, तर तिला काही ही न करता सुवर्ण आणि चांदीचा effect देता येतो..

तुमचं गाणं सोन्याचं, म्हणजेच मधुर नसेल तरी आपल्या गुह्यसुक्तम् बरोबर आपला आवाज मिसळता यायला पाहिजे..कारण आईला फक्त भाव माहित आहे..

हे गुह्यसुक्तम् ऐकताना हळु-हळू नक्कीच गा! आणि तिला भाव कसा हवाय? सोन्याशी निगडीत नाही; तर जसा असेल तसा तिच्या चरणी तिला अर्पण करायचा आहे..

हरिणी - सर्व दु:ख, त्रास किंवा आजार दुर करणारी आहे..

तिचं मुळ नाव काय? तर 'अदिती'  कारण ती 'अक्षय' आहे..कधीच 'न खंडीत' होणारी..कारण ती अखंड आहे.. शुन्याणाम् शुन्य साक्षिणी..

कश्यपाची पत्नी अदितीमती आहे..जिची 'मति' अदिती सारखी आहे, तीच अदितीमती!!

आम्हाला खात्री पाहिजे कि, "ती काही ही करू शकते..आणि ह्या जगावर सत्ता फक्त तिची एकटीची असते..बाकी कोणाची ही नाही..आणि तिची सत्ता आपल्याला मान्य असली पाहिजे..

"निरांजन चांदीचं असलं, त्यांनाच आई जास्त पावेल..आणि आमच्याकडे साधं आहे, तर त्यांना कमी" असं नाहीच! पहिला आपला 'भाव' तपासुन बघा..आणि तो तपासायला सुरूवात जरी केली नं; तर ती आपल्याला मदत करायला येते..
आपल्याला जे जे वाईट दुर करायचं असेल आणि जे जे चांगलं करायचं असेल, त्यासाठी ती मोठी आई आपल्याला मदत करायला आणि तिचा पुत्र त्रिविक्रम आपल्या शरीरात घुसून मदत करायला तयार आहेतच..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत..