My Blog List

Friday, June 26, 2015

Bapu's Hindi Pravachan Dt. 25-6-2015

HariOm
Important Points Of Parampujya Bapu's Hindi Pravachan Dt. 25-6-2015

"Shri Sai Mukhicha Varta ......"

- Hemadpant never wanted to earn anything from the writing of Shri Sainath's Leelas - Stories

- Hemadpant's Bhaav was - "Me To Keval Payancha Daas, Naka Karu Majla Udaas, Jo Vari Yahi Dehi Shwaas, Nij Karyaat Sadhuni Dya"

- When any bhakta used to tell stories of Shri Sainath, the bhaav of Hemadpant used to be that at that moment the dhool under the feet of that person (whatever be that person - a nice person, a sinner, etc) narrating the stories of Shri Sainath would purify him (Hemadpant)

- Full Bhagwat was by heart to Hemadpant

- Hum bahut saare logon ke behkave main aa jaate hain

- When somebody comes and tells us - "ki tumhare faayde ki baat kar raha hoon" then be careful about that person

- One who comes and talk to us beautifully, such a person can cheat us

- Dambhik jyotishi see our face and tell our future - they play with our physcology

- Khud ko phasana - khud ko dambhik banana - we should never do such a thing

- Jo lakhon ki baatein karte hain samaz lena ki woh insaan kuch dinon main aakar apne se paise ki bhik maangega

- Also beware from investing in properties where it is said that "Ready for possession"

- Remember that we are responsible for ourselves

- Never run behind chamatkari babas

- Also avoid taking advices from others for solving our personal problems - we have to take our own decision, e.g. Fights between husband and wife should be mutually resolved between themselves and not by others

- We may say No to our children whenever it is necessary or otherwise excess pampering will spoil the child

- We must make efforts in our life

- Bhagwaan ka ansh hum main hain, isliye hum Bhagwaan se jude huye hain

- Remember thay hum effort nahin karenge aur expect kare ke Bhagwaan effort karenge toh aisa nahin hoga

- Jitna prayas Bhagwaan humse karwana chahata hain, Bhagwaan humse karva lega

- We have to think about as to how would i be able to do the seva of God

- Doing the Naamsmaean of God with love, taking the Prasad, doing Parikrama of God is also like doing the Seva of God

- We should never ask anything in return for the Seva we do as then it becomes naukri and not seva and this is dambhikta

- Bapu does not want any of us to be bhikari

- Whatever we want we should ask from Mothi Aai and Bapu

(dear friends kindly forgive me for any typographical errors)

HariOm  ShriRAM  Ambadnya

Yezdisinh Variava

Thursday, June 25, 2015

25/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 25/6/2015  बापूंचे प्रवचन

हे जातवेदा, त्या लक्ष्मी ला आणि महालक्ष्मी ला घेऊन माझ्या शेतात ये. माझ्या घरी ये. तो सर्व जाणणारा असतो..सर्वकाही जाणत असणार आणि म्हणुन इथे 'जातवेद' हेच नाम वापरलं गेलंय..जोपर्यंत आमची खात्री बसत नाही, तोपर्यंत तो आपल्यासाठी असतोच..आम्ही 99.99% सत्य सांगितलं आणि 0.01% नाही सांगितलं! पण हे त्याला कळणारच आहे..
तुमच्याच काही गोष्टी तुम्हाला माहित नसतात. पण त्याला काही माहित नाही; असं काहीच नाही.
आपण ठरवलं, कि नातेवाईकाचं नाव लिहून काढा आणि वय लिहा; ते करता येणार नाही..
समजा, मी डॉक्टर आहे. पण बाकीचं मला काही माहित आहे का? प्रत्येक श्रध्दावानाने विचार केला पाहिजे की "माझी capacity (क्षमता) किती आहे?
'स्वस्तिक्षेम संवादा' मधे आई शी आपण बोलतो. तेंव्हा ते ह्या जातवेदाला कळतच असतं
साई चरित्रामधे दामू अण्णाची गोष्ट आहे. 'त्याला बाजार कसा करायचा, ते माहित असतं. पण त्याने पैसे घातल्यावर त्याचं नुकसान होणार आहे' ते फक्त "त्यालाच" माहित असतं!
संवाद करताना हे लक्षात ठेवा की, "तो" सगळंच जाणतो..आणि त्यामुळे त्याची आई ही त्याला जाणते..मग आपल्या मनातला पहिला अहं.. काढायला हवा कि 'त्याना काही कळत नाही'..
मग आपण म्हणू की, जर 'त्याना' माहित आहे तर मग परत त्यांना काय सांगायचं?
उदाहरणार्थ: स्वत:ची बायको आपल्याला माहित असते..पण ती सांगण्यासाठी आपण तीचं नाव बदलतोच नं!
प्रार्थना ही आपण कशी करायची, हे कोणीच ठरवलं नाही. पण जर असं असतं तर ह्या India मधे असे कितीतरी बरेच प्रार्थनेचे प्रकार झाले असते!
दिवस दिवस बसा..  आणि सगळ्या देवाना मोजायला बसा.. आमचा जेजुरीचा खंडोबा वेगळा आणि तुमचा वेगळा..
आता प्रत्येकाचे वेगवेगळे देव आणि त्या प्रत्येकाच्या प्रार्थना ही वेगळ्या!
आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, तर आपण समोर को‌णी बोलायला लागलं की आपण गप्प बसतो. पण समोरचा युरोपियन जर आपली भाषा बोलायला लागला तर आपण त्याचे कौतुक करतो..जरी त्याचे उच्चार नीट नसले तरी..
मग आपले इंग्लिशचे उच्चार नीट नाहीत म्हणुन मग आपण इंग्लिश बोलत नाही..
का?  कारण आपण त्यावेळी ह्या लोकांना हसतो..
ह्या भारतीय संस्कृती मधे उच्चाराला प्राधान्य दिलं गेलेय..'चण्डी पाठ' ह्या मधे उच्चारात चुक झाली; तर मग बरोबर नाही, असं म्हणतात. पण इथे जो प्रेम-पुर्वक ह्याचे पारायण करेल, त्याला हे व्याकरणाचे नियम लागू होत नाहीत..
आपण हिन्दी बोलताना अडकतो..आपली राष्ट्रभाषा हिन्दी आहे. भाषा ही समजण्यासाठी असते.
देवाकडे मागताना जे हवं, ते मागा. त्यासाठी कोणतीच भाषा लागत नाही. पण  त्याच्या समोर बोलताना कधीच खोटं बोलू नका.
कारण जर आपण विसरलो की हा 'जातवेद' आहे; आणि जेंव्हा जी गोष्ट घडते, तेंव्हाच्या तेंव्हा 'त्याला' कळलेली असते. चुक झालेली गोष्ट आपण आपल्या बाजुने फिरवुन फिरवुन सांगितली तरी त्या गोष्टी तो जातवेद आणि त्याची आई कधीच ऐकत नाही..
आपण जेंव्हा काही ही फोटो समोर सांगतो तेंव्हा ते 'खरं' असेल तरच तो ऐकतो..
माझी चुक असेल तर मला ती दाखवुन दे! आणि ती correct (दुरूस्त) कर. 'आई' जो आपल्या कानाला, जो शंख लावुन आहे; त्यातुन ती आपलं 'बोलणं' ऐकते. शंखाचं कार्य काय? तर तो आवाज मोठा करतात. आणि नुसत्या एका फुंके नी! आणि त्या आवाजाला वाघ, सिंह ही घाबरतात..
शंख अजुन काय करतो. तर Positive Vibration (सकारात्मक स्पंदने) तयार करतो. त्याच शंखातुन आई आपलं बोलणं ऐकते..
कारण मनापासुन आई शी बोलतो आहोत ते शुध्द होऊन आई ऐकते
जगात काय चालू आहे ते आपण पहातोय! त्यातुन नीट रहायचं आहे! तर आपल्या मोठ्या आई च्या चरणांशी रहायचे आहे..
त्रिविक्रमाचा शंख हे प्रमुख symbol (चिन्ह) आहे. आणि त्यातुन आवाज 'डमरू'चा येतो..म्हणजेच त्याला 100% फळ मिळणारच आहे.
पण "जो" सगळं जाणतोच त्याच्या समोर बोलताना excuses (कारणं/बहाणे) चालत नाहीत.
लोपामुद्रेने हे सुक्तम् लिहिले तेंव्हा तिने 'जातवेद' हा शब्द वापरला. तोच महालक्ष्मी ला आपल्याकडे घेऊन येतो..
आजपासुन निश्चय करायचा आहे कि "तो आणि त्याची आई सगळं जाणंतच आहेत"
आणि म्हणायचं आहे कि, "मी ह्या त्रिविक्रमाचा लाडका पुत्र आणि आईचा लाडका नातू/नात आहेच..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे.
आम्ही अंबज्ञ आहोत..

Friday, June 19, 2015

18/06/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 18/06/2015 बापूंचे प्रवचन

हे जातवेदा..आमच्यासाठी आवाहन करून घेऊन ये..जातवेदोमावह..  लोपामुद्रा आवाहन जातवेदाला करते..जातवेद  हे नाव त्रिविक्रमाचे आहे..ती त्याला आवाहन करते कि "हे त्रिविक्रमा, तु लक्ष्मीला घेऊन ये"..जातवेदालाच का..त्रिविक्रमालाच का आवाहन करते? शिवा ला, विष्णू, किरातरूद्राला का नाही? 
जातवेदाचा अर्थ..जो वेदांना जाणतो..पुरेपुर जाणतो..त्याच्यापासुन वेद उत्पन्न झाले आणि वेदांमुळे तो आला..
लोपामुद्रेने त्यालाच आवाहन का केले? चार ही वेदांमधे..ऋषींचे प्रमुख ध्येय काय होतं..'सामान्य मनुष्य' हेच त्यांचं ध्येय..सामान्य मनुष्याचं जीवन  आणि त्यांच्या जिवनात त्यांचा अभ्युदय..प्रापंचिक, शैक्षणिक पासुन ते पारमार्थिक प्रगती..ह्या ऋषींना ह्याची काळजी होती..हे महर्षी होते..पण तरी त्यांचं प्रेम  सामान्य माणसाबद्दल होतं..म्हणुन सामान्य मनुष्यांना कळू शकणार नाही, असं त्यांनी कधीच लिहिलं नाही..ह्या ऋषींना जे काही दिसलं..ऋषींना ब्रम्हर्षी पद प्राप्त झाल्यानंतर अखिल कल्याणासाठी चिंतन करीत असताना जे ज्ञानाचं भंडार त्यांच्यासमोर उघडं केलं..ते ज्ञान..म्हणजे शब्द नव्हे नुसते...जे आहे ते तसंच्या तसं सांगणे..जे जसं आहे त्यानुसार परमेश्वराने निर्मिलेलं आहे, त्याचा परमेश्वरी नियमानुसार उपयोग व्हावा, तेच ज्ञान....
ज्ञान म्हणजे, जो काही विषय आहे..मग ते काही असो..ते का निर्मिलं तिथपासुन ते जाणुन घेऊन त्याचा उचित वापर संपुर्ण विश्वाच्या कल्याणासाठी कसा करता येईल, हे शिकणं; म्हणजे ज्ञान..
वेदांमधे प्रत्येक सुक्तात कुठल्या न कुठल्या देवतेचं आहे..
ह्यातली प्रत्येक ऋचा,  मानव कल्याणाच्या अत्यंत पवित्र भावनेने भरलेली आहे..ह्यात लोपामुद्रा ही प्रमुख आहे..
लोपामुद्रा एक दिवस रस्त्याने चालली होती..तिच्यासमोर मुंगळ्यांची रांग चालली होती.. ते मुंगळे उन्हात चालत होते..मग तिने मुंगळ्यांच्या पायाला चटके बसतात कि नाही हे बघितलं..मग का बसत नाहीत, हे शोधुन काढलं..अन् ते शोधता शोधता तिला चटका बसणं नाहीसं झालं..
जर ती मुंगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी पण तयार आहे..तर आपण सामान्य माणसांनी पण तयार असलंच पाहिजे..तो त्रिविक्रम एकच एक असा आहे, जो वेदांना जाणतो..
म्हणुन तो 'जातवेदा'..
आदिमातेने शेकडो ऋषींना ज्ञान प्रगत केले आणि ते प्रगट होत असताना त्याच्या साक्षीसाठी त्रिविक्रम होता..
तीन पातळ्या.. ज्ञानाच्या...
'बुध्दीची'
'मनाची'.. ज्ञान झालं की ते 'पटणं' आवश्यक असतं..
'क्रियेची'.. मनाला पटलं तरी कृतीच्या पातळीवर यावं लागतं..
आणि ह्या तिन्ही पातळीवर जो कार्य करतो, तो त्रिविक्रम.. आणि म्हणुन वेद आले अन् मग जो जाणता झाला नाही; तर वेद येत असतानाच तो जाणत होता..
ह्या आदिमातेने हे वेद प्रथम त्रिविक्रमाकडे सोपविले.. मग त्याने तीन पावलं एकाच वेळेस टाकत स्थिर केले.. लोपामुद्रा म्हणजे जिला 'ब्रम्ह' म्हणजे काय? ते कळलेलं आहे.. आणि ती ते अनुभवते.. तिच्या जीवनात जरा ही अपवित्रता नाही.. ती ब्रम्हवादिनी.. स्वप्नात ही जी असत्य बोलत नाही...तिला माहित आहे की, त्रिविक्रमानेच सर्वांना वेद दिले..
जो ब्रम्हर्षींना देऊ शकतो ज्ञान तीन ही पातळीवर. मग सामान्य माणसा साठी का नाही...

त्रिविक्रमा शिवाय जीवनामध्ये कुठलं ही सौंदर्य प्राप्त होऊ शकत नाही..जीवनातली कुठली ही गोष्टं मधुर, सुंदर बनवायची असेल तर त्यासाठी तो 'त्रिविक्रम' अत्यंत आवश्यक आहे..

जीवनामधे.. आपण एका कल्पनेत राहतो..आम्हाला सगळं 'परफेक्ट' लागतं.. कोणी ही मानव 'परफेक्ट' असुच शकत नाही.. ते फक्त मोठी आई अन् तिचा पुत्र...
परफेक्शन म्हणजे 'क्षितीज'.. परफेक्शन... म्हणजे जरा ही चुक नसणं.. अचुक.. आणि असं असुच शकत नाही.. पण म्हणजे सर्वच्या सर्व चुक आहे; अशात जगायचं नाही..
Perfection is impossible... हे लबाड बुध्दीमान लोकांनी न्युनगंड उत्पन्न करण्यासाठी बोलतात..  मला perfect नाही तर आज आहे त्यापेक्षा ऊद्या चांगलं बनवायचंय..
जो 'त्रिविक्रमाचा, ह्या आदिमातेचा' झाला; तो प्रत्येक जण प्रत्येक दिवशी आधीच्या दिवसापेक्षा अधिक प्रगत झाला पाहिजे.. त्याच्या स्थुल, प्राणमय अन् मनोमय देहात 'त्याची' तीन पावलं उमटत असतात.. तो दररोज लक्ष्मी ला आमच्यासाठी आवाहन करत असतो... म्हणुन ही लोपामुद्रा 'जातवेदाला' आवाहन करते, की लक्ष्मी ला तू घेऊन ये...
आपल्याकडे मोठी capacity (क्षमता) आहे.. आपल्याला प्रार्थना करता येते...प्रार्थना, म्हणजे पुर्ण श्रध्देने 'त्याला' हाक मारणं... ही capacity (क्षमता) माझ्याकडे आहे.. ती मी वापरतो का?
लोपामुद्रा वापरते...
त्रिविक्रम आणि त्याची माता अगदी मुंगी पासुन प्रत्येक मानवाची प्रार्थना ऐकत असतात...
आणि ऐकुन action (कार्यवाही) पण घेतात.. पण ते आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी मला connection (संपर्क) निर्माण करावं लागतं.. आणि त्यासाठी विश्वास पाहिजे...एक विश्वास...आपला विश्वास जर 70% आहे तर 700 पट जास्त येईल.. कुठली ही गोष्टं आपण मागितली आणि जर ती अनुचित नसेल तर ती त्याच क्षणी आलेली असते...पण मला प्रार्थना करता आली पाहिजे...आपल्या शब्दांमधे आपलं म्हणणं, आपल्याला मांडता आलंच पाहिजे..
प्रार्थना म्हणजे नुसतं 'मागणं' नव्हे..
प्रार्थनेचे दोन भाग आहेत..
आरतीमध्ये पहिल्यांदा त्या त्या देवतांवरचा विश्वास आहे...
त्याला म्हणतात, 'स्तुती प्रार्थना'
दुर्गे दुर्घट भारी..... हे आदिमाते, तुझ्या शिवाय ह्या संसारात प्रत्येक गोष्टं कठीण अन् दु:खदायक होऊन बसते..
अनाथ नाथे अंबे...
जो जो म्हणुन कोणी अनाथ आहे त्याला तू सनाथ करणारी आहेस...
अंबे म्हणजे माझी आई...माझी प्रिय आई...हे तीन शब्द एकत्र म्हणजे 'अंबा'... अनाथाची नाथ आहेस तु..मी अनाथ असू शकत नाही..कारण तु माझी प्रिय आई आहेस..
करूणा विस्तारी..हे आदिमाते, तुझी करूणा एवढी अपरंपार आहे..मी खुप लांब ऊभा आहे तुझ्यापासुन..माझ्यात कुठलीही क्षमता नसेल, पण तुझ्यात आहे...तु तुझ्या करूणेचा विस्तार कर..मी आहे; तिथपर्यंत..
मागायचं, कसं मागायचं..आपण मागायला पण शिकलं पाहिजे.. आपल्याला परमेश्वराने 'प्रार्थना' ही शक्ती उपजतच दिली आहे..मानव पहिली प्रार्थना..पहिली 'हाक' आईलाच मारतो..ही 'जगताची आई' आहे..तिला हाक मारण्याशिवाय आपल्याला पर्याय असुच शकत नाही..जसं, त्या बालकाची हाक आई ला कळतेच नं! सामान्य आई ला कळते; तर मग त्या जगदंबेला का कळणार नाही..'ती' प्रार्थना ऐकत असलीच पाहिजे..

दुसरं Proof (पुरावा)
शांत कुठे ही बसा... अन् विचार करा, कि आपण किती चुका केल्या लहानपणापासुन... आणि तरी परमेश्वराने आपल्याला किती दिलं...
म्हणजेच माझी आई लक्ष देत असते..
ती मला सहाय्य देतंच आहे..त्रिविक्रम मला प्रत्येक गोष्टीत सहाय्य करतोच आहे..

तिसरं Proof (पुरावा)
रोज रात्री 10 minutes be still n silent (10 मिनिटे स्थिर न शांत बसा)..आणि शांती अनुभवायची.. हळू हळू तुमच्या मनाला 'शांती' (peace) मिळायला लागेल...
जी उत्तरं तुम्हाला कधी सापडली नव्हती..ती, त्या 10 मिनिटात मिळू लागतील..'ते दोघे'..त्रिविक्रम आणि मोठी आई तुमच्या शांततेचा आवाज 'ऐकतात'
जर ते शांततेचा आवाज ऐकू शकतात, तर बोलण्याचा नक्कीच ऐकतात..जर विचार कुठला आला, तर म्हणायचं; "हा विचार माझा नाही" त्या 10 मिनिटातले 2 सेकंद सुध्दा तुम्हाला आदिमातेशी जोडून देतील..आणि 'हेच ते आवाहन'  जातवेदोमावह:  ...
रात्रीची 10 मिनिटं शांत बसा..शरीर आधी स्थिर अन् मन शांत.. atleast (कमीत-कमी) शरीर तरी स्थिर करूया.. मुद्दाम विचार करायचा नाही..
फक्त आधी बसताना म्हणा..
हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
आणि झाल्यावर म्हणायचं, "जय जगदंब जय दुर्गे"..  जेंव्हा मनुष्य, शरीर स्थिर करतो; तेंव्हा हा त्रिविक्रम त्याची 'तीन पावलं' उचलतोच.  600 सेकंदा मधे कमीत कमी 3 सेकंद तरी तुमचं connection (संपर्क) आदिमातेशी जोडलं जातं..आणि जशी सवय होत जाते तसा तो 3 सेकंदाचा काळ वाढायला लागतो..
उत्साहवर्धक द्रव्य जे लागतं..ते गुह्यसुक्तम् मधुन मिळतं..
10 मिनिटं शांत बसा कि तो त्रिविक्रम तुमचं आयुष्य जाणण्यासाठी आहे. जे जे आवश्यक आहे..ते आणुन देईल..
लक्ष्मी म्हणजे सर्व प्रकारची सौंदर्य-शक्ती..हे सर्व पुरवणारी लक्ष्मी आहे आणि सर्व संपन्नतेला घेऊन येणारा हा त्रिविक्रम आहे..
म्हणुन लोपामुद्रेने म्हटलं...
जातवेदोमावह..
रोज रात्री 10 मिनिटं बसायचं..आधी बसताना म्हणा..हरि ॐ   श्रीराम   अंबज्ञ
शांत बसायचं आहे.. त्या 10 मिनिटात प्रयत्न करूच नका..कुठला ही विचार जर माझ्या मनात आला, तर समजायचं कि तो विचार माझा नव्हता.. अन् झाल्यावर "जय जगदंब जय दुर्गे" म्हणायचं..
रात्री झोपताना रामरक्षा म्हणा..म्हणताना झोप लागली तर तुमचा बाप ती पुर्ण करेल..
आपला बाप अन् आई जे काही करतात ते मुलांसाठी कधीच उपकार नसतात..

म्हणुन ती लोपामुद्रा म्हणते..
हे त्रिविक्रमा, तू त्या लक्ष्मीला माझ्या शेतात, माझ्या कुळात सर्व ठिकाणी येण्यासाठी आवाहन कर अन् घेऊन ये! आणि हा हट्ट फक्त ती बापाकडेच करते.. आपली आजी एवढी असताना, आपला बाप असताना आपल्याला काळजी कसली..आपल्याला काळजी नाही..
ह्या विश्वातील समग्र ज्ञान, म्हणजेच प्रत्येक शुभ गोष्टींचा प्रारंभ..वेद मंत्रानेच होतो..त्रिविक्रम म्हणजे जे जे काही शुभ मंगलमय ते सर्वच्या सर्व जो निर्माण करतो आणि अमंगल दुर करतो, तो त्रिविक्रम..अन् तो जातवेदा..

"ॐ श्री जातवेदाय नम:" 5 वेळा जप करा..

आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी कधी म्हणायचं..
दर महिन्याच्या 18 तारखेला जो कोणी 5 वेळा हा जप म्हणेल, त्याला आजसारखंच connection (संपर्क) जोडला जाईल..
ज्या दिवशी लक्ष्मीपुजन करू..श्रीसुक्तम् म्हणता आलं तर चांगलंच.. पण हा मंत्र 5 वेळा म्हणुन सांगू शकता! आपल्या भाषेत सांगायचं..की "माझ्याकडे पुजनाला घेऊन ये..

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे..
आम्ही अंबज्ञ आहोत...

Friday, June 5, 2015

4/6/2015 बापूंचे प्रवचन

हरि ॐ दिनांक 4/6/2015      बापूंचे प्रवचन

उपनिषद वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर मणिद्वीपचं चित्र येतं..मग तुम्हाला वाटतं कि नाही, आपण त्या मणिद्विपात बसलो आहोत..माझी लायकी आहे कि नाही, हे विचार न करता; आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत, अशी कल्पना करायला पाहिजे..आणि जेंव्हा जेंव्हा आपण तिच्या प्रतिमेसमोर बसतो; तेंव्हा असाच भाव असला पाहिजे की, "आपण तिच्या मणिद्विपात बसलो आहोत"
चंद्रां हिरण्यमयीं
लोपामुद्रा म्हणते की ज्याच्या आजुबाजुला असलेला प्रकाश म्हणजे सुर्याप्रमाणे तो प्रकाश तीव्र नसतो, तर तो प्रकाश; सौम्यच आहे..
पण त्याच्याही पलिकडे जाऊन लोपामुद्राला, काहीतरी सांगायचे आहे..

लोपामुद्रेचा मंत्र, 15 अक्षरांचा आहे..आणि 16 वे अक्षर हे 'लक्ष्मी किंवा सद् गुरूच असतो..

15 अक्षरं, म्हणजे 'बीज' आहेत ज्यांना नित्य म्हणतात..आणि जेंव्हा ह्या 15 नित्य पुर्ण झाली; की मग ती "सोळावी, म्हणजे 'ती' आई येते"

चंद्राच्या कला 15 आहेत आणि 16 वी कला म्हणजे अमावस्या आहे.आईच्या मंत्राची कला '16' वी, ही अमावस्या नाही..

आमची इच्छा काय असते? तर ही लक्ष्मी, अनपगामिनीम् म्हणजे; आमच्यापासुन कधीही दुर न जाणारी असावी..

अमावस्येच्या दुस-या दिवशी चंद्राची कला कमीच दिसते. आणि मग 15 दिवसांनंतर ती पुर्ण दिसुन येते.

जशी चंद्राची कला कमी होत जाते तसं त्याच्या आकाशातील अनेक तारे चमकायला लागतात..आणि अमावस्येच्या रात्री खुप तारे असतात..

आम्हाला लक्ष्मी कशी हवी असते? चुटकी वाजवली कि, ती यायला हवी म्हणजे आपल्याला कमी श्रमात आणि कमी वेळेत लक्ष्मी हवी असते पण तो लक्ष्मीचा मार्ग नाहीच!

आपल्याला लक्ष्मी, 'अनपगामिनिम्' हवी असेल तर चंद्राप्रमाणे तिला स्विकारायला हवं..
आपल्याला पैसा चटकन हवा असतो..मी गेली 16 वर्ष सांगतोय, की कोणत्याही स्किम मधे पैसे गुंतवू नका.. पण तरी आपल्या मोहामुळे आपल्या डोळ्यांवर पडदा पडतो..
आणि मग '20 वर्षांनंतर जागा नाही मिळाली' तर मग देवाला शिव्या घालतो..
झटपट पैसा मिळवण्याची स्किम तुमच्याकडे आली तर 'त्यांना सरळ हात जोडायचे..कारण त्यात success (यश) कधीच नसतं..

माणसात, 'ठग' अनेक जण असतात आणि अश्यांना आपण का बळी पडतो? अश्या ठगांना बळी पडू नका..
मग इथे imp (महत्वाचे) काय आहे? तर 'चंद्राम्' म्हणजे step wise progression. (पायरी-पायरी ने प्रगती)

ज्या व्यक्तीने बँकेकडून Loan (कर्ज) घेतलंय आणि त्याने वेळच्या वेळी ते loan (कर्ज) फेडलंय, तर मग ते बँक वाले स्वत: येऊन त्याचे काम घरी करतात; कारण त्याचा business (व्यवसाय) नीट चालु आहे.

7 दिवसात इंग्लिश शिका, असं कधीच शक्य नाही..spoken & written language (बोलणं आणि लिहीण्याचं केंद्र एकच आहे..कोणी ही कितीही हुश्शार असलं; तरी त्याला इंग्लीश चांगल्या प्रकारे येण्यासाठी त्याला कमीत कमी 6 महिने लागतातच!
आम्ही ह्याच्या मागे जातो आणि आपल्याला 'अनपगामिनी' हवी असते, पण येतं कोण? तर त्या लक्ष्मी ची बहिण अवदसा येते..आणि ती चुकीच्या मार्गाने पैसे आणते..

मीना वहिनीं नी सांगितलंय की

आता कैसी अमावस्या.. नित्य अनिरूध्द पोर्णिमा..

पण हे कधी घडेल? जेंव्हा आपण अनिरूध्दाचे होऊ तेंव्हाच..
आपण cheating (लबाडी) करायला लागलो; की देव cheating (लबाडी) करत नाही, तर देव आपल्यापासुन अलिप्त होतो..

त्याच्याशी खोटं बोलू नका आणि त्याच्या'विषयी' खोटं बोलू नका..

साई चरित्रामधे आपण दामू अण्णाची गोष्टं पहातो..
त्यात शामा, बाबांना दामू अण्णाचं पत्र वाचुन दाखवतो; तर बाबा म्हणतात की आपल्याला नाही करायचं हे..पण शाम्याच्या मनात बाबांना कमीशन (पाती) देण्याचं असतं!!..
काही काळानंतर त्यांचा business partner (व्यवसाय भागीदार) धुळीला मिळतो पण शामा चं नुकसान नाही होत!

'चंद्राम्' ह्याचा मुळ अर्थ आहे 'तू जे काही ह्या सृष्टीमधे चांगलं होतं, ते म्हणजे ऋत'..म्हणजे जी आपला ऋत maintain (व्यवस्थित) करते ती, जी आपला श्वास maintain (नीट) करते ती, म्हणजे 'चंद्राम्'...

पाऊस पडून गेला, तर जमीन लगेच कोरडी होते का? नाही नं..काही वेळ जायलाच पाहिजे..हा त्या निसर्गाचा नियम राखलाच पाहिजे..

तुमच्या घरात दागिने असतील तर ते तुम्ही लॉकर मधे नेऊन ठेवता..तुमच्यासाठी दागिने अदृष्य होतात; पण ते सुरक्षित असतात..

हिचं अस्तित्व चंद्रासारखं आहे..जे आपल्याला योग्य आहे, ते-ते ती देणार आहे..पण आपला धीर रहात नाही..
मग आपण इथे त्या त्रिविक्रमाला आवाहन करायचं आहे..

आणि ती लक्ष्मी क्रमशील मार्गाने येणार आहे..कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच..क्रम, विक्रम आणि त्रिविक्रम आहे..

केवळ एक माणुस श्रीमंत झाला, तर मत्सराने त्या व्यक्तिला कधीच असं म्हणायचं नाही कि, "त्याने चुकीच्या मार्गाने मिळवला असणार"..असा दोष देऊ नका..कारण जर त्याने तो पैसा चांगल्या मार्गाने मिळवला असेल तर तो दोष त्या माणसाला नाही लागत तर त्या लक्ष्मी ला लागतो..

तेंव्हा असं म्हणा, कि "देवाला माहित"

तेंव्हा जय जगदंब जय दुर्गे असं म्हणुन सोडून द्यायचं..

कारण ते करताना तुम्ही लक्ष्मी ला दोष देत असता..आणि तिला दिलेला दोष, त्या महाविष्णूला आवडत नाही..कारण जिथे महाविष्णू नसेल, तिथे ती लक्ष्मी नसेलच..

मॅगी खाल्ल्याने लहान मुलांचं अभ्यासात लक्ष नाही लागत..50 वर्ष वय असलेल्या माणसाने खाल्ली तर त्यांना सुध्दा बराच त्रास उदभवतो..मग आपण का खातो?? फक्त चव चांगली आहे म्हणुन??
इथे आहेत, त्यातल्या 172 जणांनी मॅगी खाल्ली आहे, मग आता तरी ती खाणं सोडा..
हे असं का घडलं??
1) बायका, मुलांना जेवण बनवुन द्यायचा आळस
     करून त्या मुलांना मॅगी देतात
2) जेवणाच्या वेळेसच ह्या मॅगीच्या ad (जाहिराती)
     लागतात..

देवाने तुम्हा स्त्रियांना वरदान दिलेय..मातृत्वाचं..मग ते चांगलंच आहे नं..त्याचा विचार करा..

मग कधी बायको ला बरं नाही, म्हणुन नव-याने त्या दिवशी चहा दिला तर तिला आवडेल नं..पुरूषांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही त्या बाजुने विचार केला पाहिजे..

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा आणि परमशिव आणि प्रजापती ब्रम्हा वेगळे नाहीत तर एकच आहेत..आणि बळकट मन तर बळकट शरीर...

लक्ष्मी आणि अन्नपुर्णा ह्या एकच आहेत..
आपल्याला आपल्या आयुष्यात लक्ष्मी हवीय, अधिक पैसा मिळवणे चांगलंच आहे पण तो 'क्रमाने' मिळवा, श्रम करून मिळवा..

थोड्या वेळेत खुप पैसा मिळवणे, जास्त टिकणारे नसते..
मी माझ्या आईला cheat (फसवलं) केलं तर तिला कळणार नाही! पण तसं नाही; त्या 'मोठ्या आईला' आणि तिच्या 'पुत्राला' कळतंच..

प्रत्येकाच्या मनाचं connection (जोडणी) येऊन ते त्या परमात्म्याशी जोडलंच जातं..

ईश्वराचा धाक असलाच पाहिजे..
अलक्ष्मी, नेहमी दु:खच घेऊन येते..ह्या विश्वावर राज्य, फक्त त्या आदिमातेचंच आहे..
आपण जर ह्या चंद्राच्या मार्गाने पुढे गेलो तर आपल्याला अपेक्षित नसलेलं सुध्दा आपल्याला चांगलंच मिळेल..

- एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा..

- माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते..

गुरूक्षेत्रम मंत्र, हा आपल्याला नेहमीच आधार देणारा आहे..आणि हा गुरूक्षेत्रम मंत्र म्हणजे त्या त्रिविक्रमाचं मंत्रमय स्वरूप आहे..

त्यातला तो 'अनिरूध्द' म्हणजे तो 'श्रीविद्येचा पुत्र म्हणजे त्रिविक्रम'

हरि ॐ

भाषांतर
मिलिंदसिंह फणसे

मी अंबज्ञ आहे
आम्ही अंबज्ञ आहोत...