My Blog List

Friday, January 30, 2015

Pravachan on 29th January 2015

हरि ॐ दिनांक 29/01/2015 प्रवचन

अवघाचि संसार आपण नीट पाहिला..

आता चवथा पॉइंट आहे आपला "चिकाटी"

स्वार्थ मधला चिकाटी हा महत्वाचा गुण आहे आणि जो आपलं जीवन भलं करायला खुप गरजेचा असतो आणि आपल्यातच तो खुप कमी असतो.
एकदा काम करा.. एक पेन व पेपर घेऊन बसुन, "आपण किती काय काय ठरवलं पण चिकाटी नसल्याने केल्या नाहीत", ते पहा.
मग आपल्याकडे ही persistency (चिकाटी) का नसते??
10% माणसांकडे प्रत्येक गोष्टीसाठी चिकाटी नसते.वाईट करायला चिकाटीची गरज नसते..मग चांगलं करताना आपल्याला आपली चिकाटी का वापरता येत नाही.

देवाने प्रत्येकाला चिकाटीचं केंद्र हे दिलेलंच असतं..म्हणुन आपल्याला भुक लागते, तहान लागते.  आणि आपल्या (ब्रेन) मेंदूमधे ते केंद्र असुनही आपण ते नीट वापरत नाही..

समजा आपल्याकडे खुप पैसे आहेत पण जीवाला मारून जगत असाल तर आपल्या जगण्याला काय अर्थ आहे??

मी एक माणुस पाहिलेला, तो  एका धोतराचे दोन भाग करून ते आपल्या गुडघ्यापर्यंतच बांधायचा आणि एकच बंडी वापरायचा..सकाळी लवकर ऊठायचे, झाडाखाली असलेल्या काठ्या गोळा करून बंबात पाणी गरम करायचा, भातही बनवायचा. बाकीचे जेवण स्टोव्हवर करायचा.. पाहिल्यावर वाटायचं कि हा माणुस गरीब असेल. पण मुंबईत त्याच्या मालकीच्या 18 चाळी होत्या, 10-12 दुकानं होती. आणि तीन दुकानं ह्याची मुलंच चालवत होती. सगळा पैसा त्याच्याकडेच यायचा. दोन सुना शिक्षिका होत्या, त्यांचाही पगार याच्याकडेच! त्याना 20-20 मिनीटे चालत जावं लागायचं.. जेंव्हा ते वारले तेंव्हा त्यांच्या जवळचे कोणीच नव्हते. त्यांच्या धोतराच्या कनवटीतुन 100 च्या 30 नोटा मिळाल्या.. पलंगावरच्या गादी खाली दिड लाख मिळाले. कपाटात बरेच सोने अन् दागदागिने मिळाले.. आयुष्यभर सगळं असुन पण वापरलं नाही..
असे तुम्ही पण सगळे कवडी-चुंबक आहात.. आणि आपण कशासाठी कंजुस  आहोत? तर चिकाटी वापरायला..

आपण एरवी चिकाटी वापरतो पण जेवताना, काम करताना.. पण अशी ही चिकाटी प्राण्यासारखी असते. आपल्याला प्रत्येकाला 100% चिकाटी ही आहेच आहे.. हे सगळं मॅनेज करण्याचं केन्द्र आहे, मेन्दुमधे, ते म्हणजे 'चिकाटी'..
जोपर्यंत आपला श्वास चालू आहे म्हणजे आपल्याकडे चिकाटी ही आहेच.. मग बापू आम्ही चिकाटी का वापरत नाही? पण चिकाटी न  वापरण्याच्या फायद्याचे आपण व्यसनी झालेलो असतो.

चिकाटी न वापरल्याचा फायदा काय तर चिकाटीसाठी आपल्याला एकच पर्याय धरुन ठेवावा लागतो आणि ते आपल्याला कधीच नको असतं. तेंव्हा आपल्याला (freedom) स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं कि चिकाटी नाही वापरली तर आपल्याला मिळणारं स्वातंत्र्य कमी होतं, असं मनाला वाटत असतं..

भाग मिल्खा मधे एकदा तो पडतो आणि तेंव्हा त्याचा गुरू त्याला 'उठ' असं ओरडतो.. आणि त्याला जे 'हवं' ते करायला लावतो.. त्याला तो एका ऊद्दीष्टाला धरुन ठेवायला सांगतो.

पण मला पाहिजे तसं मला वागता आलं पाहिजे, हे आपल्याला हवं असतं.. चिकाटी न वापरण्यामागे माणसाचा स्वत:चा चुकीचा फायदा असतो.

अतिशय महत्वाचं वाक्यं-
"जे लोक यशस्वी होतात, ते चिकाटी ने यशस्वी होतात..तेंव्हा ते समोर एक (main goal) मुख्य ध्येय ठेवतात आणि बाकी (sub-goals) ऊप-ध्येय ठेवतात. मग जीवनाच्या कोणत्याही अडचणीपेक्षा आपलं (goal) ध्येय, ते मोठं आहे असं सांगतात आणि मग ते चिकाटीचं केन्द्र (automatic) आपोआप काम करू लागतं"..

आपल्याला आपलं ध्येय ठरवता आलं पाहिजे. मग आपलं चिकाटीचं केंद्र काम करायला लागेल. चिकाटी आपण वापरत नाही आहोत. जीवनाचं ध्येय (goal) हे मोठंच असलं पाहिजे असं नाही..साधं असेल तरीही आपलं जीवन हेच मोठं ध्येय असतं..

एका सरकारी ऑफिसमधल्या शिपायाला पॅरिसला जायचं होतं, एक म्युझियम पहायला! तर त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. पण त्याने त्याचा पगार हा घरासाठी वापरला आणि ट्रेनमधे पेनं वगैरे विकून त्याने तेवढे पैसे जमवले. त्याने गोळा केलेले त्या पॅरिसचे फोटो, माहिती एका फ्रान्सच्या माणसाने पाहिलं. त्या फ्रान्सच्या माणसाच्या पत्नीला एका प्रोजेक्टसाठी जी माहिती हवी होती, ती सहजच मिळाली आणि त्यावर खुश होऊन त्या शिपायाचा जाण्या-येण्याचा तिकीट खर्च आणि 6 महिने रहायची सोय ह्या फ्रान्सच्या माणसाने केली..इथे त्याची चिकाटी कामाला आली.. आणि त्याची जाण्याची वेळ जेंव्हा आली, तेंव्हा त्याच्या मुलीचं लग्न ठरलं.. पण त्याने त्याच्या मुलीला समजवलं आणि तिनेही सर्व मान्य केलं..आणि मग ज्या आजीसाठी लग्न लवकर करायचं होतं, ती आजी वारली.. आणि तो फ्रान्सवरून आल्यावर त्याच्या मुलीचं लग्न ही नीट झालं.. ह्याला म्हणतात चिकाटी.. "देव कधीच कोणाची परिक्षा बघत नाही" हे ह्यातुन आपल्याला समजतं..

आपल्या गरजे मधे आणि ध्येय यामधे फरक आहे.. आपण विचार केला पाहिजे की आपलं ध्येय काय आहे.. आपण माकडा सारखं जीवन जगत आहोत. आपण एकदा या फांदीवर तर ऊद्या दुसरी..

एक श्रध्दावान बाई आहे, आणि तिचं ध्येय होतं कि तिला मरण्याच्या आधी 324 वेळा साईसच्चरिताचे सप्ताह करायचे होते. तिने तिची सर्व कामं सांभाळुन 324 सप्ताह केले. त्या स्त्रीने वयाच्या 34 व्या वर्षी केलेला निर्णय तिने हल्लीच तीन महिन्यापुर्वी  वयाच्या 81 व्या वर्षी तिचे सप्ताह पुर्ण केले.. आणि हे सर्व तिने घरातलं सर्व सांभाळुन केलं.. दोन सुना वेगळ्या राहिल्या.. म्हणत असे, बाबांची इच्छा.. कारण तिचे ध्येय काय ते तिने पुर्ण केले..
सर्व सप्ताह पुर्ण केल्यावर गुरूक्षेत्रमला ती स्त्री आणि तिचा पती आले.. दादांना ती पोथी हात लावायला दिली आणि मग मला (बापूंना) ही दिली.. मग अचानक मोठी सुन आली, लहान मुलाला नीट सांभाळण्यासाठी येऊन एकत्र राहू लागली.. तिच्या पुर्ण झालेल्या ध्येयानंतर तिचं काहीच ध्येय नव्हतं..

"ध्येय हे असं असलं पाहिजे कि ते ध्रुवपद असलं पाहिजे जे कोणीच बदलू शकत नाही".
कारण त्या स्त्रीच्या चेह-यावरचा आनंद पाहिला आहे..
माझ्या संपुर्ण मनाला कायमचं सुख देईल त्याला ध्येय असं म्हणतात.. त्या साठी आपण असं पारायण केलं पाहिजे असं नाही. पण जीवनात चिकाटी ही असलीच पाहिजे..

ध्येय पुर्ण करण्यासाठी चिकाटी असलीच पाहिजे.. आणि त्या ध्येयासाठी दुसरी गोष्ट आपल्याला तुच्छ वाटली पाहिजे.. कारण त्या ध्येयासाठी इतर वस्तू सोडती आल्या पाहिजेत..

"ध्येय आलं कि चिकाटी येते"..

एखादी चुकीची गोष्ट सतत करणे म्हणजे चिकाटी येत नाही.. आपण जेंव्हा टाईमपास करायला लागतो तेंव्हा समजा कि आपलं काहीच ध्येय नाही..

आपण म्हणतो की आपले कोणी नातेवाईक नाही, मित्र नाही! असं न म्हणता आपलं ध्येय हेच आपला मित्र बनू शकते..

"आपलं ध्येय हे स्वावलंबी च असायला पाहिजे"..

परावलंबी जीवन कधीच कामाला येत नाही.. मग आपण स्वावलंबी असण्यासाठी आपलं ध्येयपण तसंच स्वावलंबीच असायला हवं..

कोणाकडून मान मिळेल म्हणुन काहीही करू नका..मी कोणाचं चांगलं करतोय असं मनात सतत ठेवलं तर माणसं तुमच्या रस्त्यात अजुन काही आणुन टाकतील..पण त्यासाठी आपण का अडायला हवं??? आपण आपल्या ध्येयासाठी पुढे जायचंच आहे..
आपलं ध्येय लहानच असेल तर काय झालं..मग 'मी ग्रेट आहे' असं म्हणायला काहीही हरकत नाही.. त्या पुढे अंबज्ञ म्हणाल अजुनच छान आहे..अशी लहान लहान ध्येय ध्येय मिळाल्यावर आनंद करा..

काहीतरी आपल्या जीवनाला एक बळकट ध्येय असू द्या..आणि ते ही त्या मुख्य ध्येयाच्या विरुध्द असता कामा नये.. प्रमुख ध्येयाला सुसंगत अशी बाकीची (sub) उप ध्येय असायला हवीत..

आज जर आपलं वय 80 असेल तरी काही नाही. अजुन पण आपण ध्येय ठरवुन आपलं भलं-मोठं काही तरी करू शकता..

आम्हीही काळाच्या बरोबर असलं पाहिजे.. आणि त्यात लहान लहान गरजा येतातच..पण त्या ध्येयाच्या मधे काही येऊ देऊ नका..
एकदा ध्येय ठरलं कि बाकीच्या गोष्टींवर मात आपण करू शकतो.. मग आपल्याकडे ध्येय आहे का? नसेल तर आपल्याला ध्येय देणारा लागतो..

1 जानेवारी 2012 च्या दिवशी मी, "एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा" हे ध्येय दिलं.. ह्या वर्षात 'प्रेमाचं' ध्येय आहे. आपल्याला कोणी प्रेम दिलं पाहिजे असं मुळीच नाही.. पण आम्ही बापूंचं प्रवचन ऐकुन त्यातुन आपलं ध्येय आपण ठरवुन पुढे चालुया.

गावा मधे असलेल्या लोकांमधे लहान ध्येय असतात. कि या वर्षी वारी ला जायचंच. मग तेंव्हा मुलगी किंवा सुन आजारी असली तरीही ती लोकं, वारीला जातातच.. आणि मग त्यातच त्याना मिळणारा आनंदही मिळतोत..

आपल्या कडे चिकाटी पाहिजे आणि ध्येय पाहिजे.. मग भगवंत आपली काळजी घ्यायला तयार आहेच.मग आपल्या प्रत्येक (heart-beat) हृदयाच्या ठोक्याबरोबर ही चिकाटी आपल्या जीवनात उतरत असेल..

साई चरित्रात बाबा म्हणतात नं,
तुम्ही जोर मारू लागा..
दुधाची काळजी सर्वत्र त्यागा..

मी मागे वाटी घेऊन ऊभा आहे.. पण तुम्ही म्हणाल कि आम्ही बसू आणि साई तू जोर मार, तर तसं चालणार नाही..

"जन्म माझा व्यर्थ ना हो..
मृत्यू लागो सार्थकी"..

जीवन हे व्यर्थ आहे जेंव्हा ध्येय नसेल..

संसार सुखी करायचा असेल आपल्याला आपल्यात चिकाटी आणली पाहिजे.. आणि ती चिकाटी असेल तर आपल्याला अख्ख जग जिंकता येईल..
त्यासाठी
"एक विश्वास असावा पुरता".. ..आपण त्या साठी जोर काढले पाहिजेत..

ह्या वर्षात आपण प्रेम करायला शिकणार आहोत पण त्या बरोबरच आपल्याला आपलं ध्येय असलं पाहिजे.. आणि आपली नजर आपल्या ध्येयावर ठेवा..
आणि मग..

बनता बनता बनेल.. म्हणजे असं काही घडेल जे आपल्यासाठी 'सर्वोच्च' असेल हे नक्की..

Thursday, January 22, 2015

Pravachan on 22nd January

हरि ॐ  गुरूवार  दिनांक 22/1/2015 प्रवचन

अवघाचि संसार सुखाचा करीन..त्यात आपण संवाद पाहिला..आता त्यातही एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे आपल्या आजुबाजूला बरेच लोक आहेत..
आपण आपल्या स्वत:ला एक प्रश्न विचारला पाहिजे कि आपण आपल्या समोरच्याला प्रत्येक गोष्ट सगळी सांगतो का? आपल्या मनात 99.99% हा विचार येतोच..पण आपण अपेक्षा करतो की समोरच्याने आपल्याला सगळं सांगितलं पाहिजे. आणि ह्या अपेक्षे मधुनच 99% प्रॉब्लेम होतात..परमेश्वराने दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचा आपण प्रत्येकाने मान राखला पाहिजे..प्रत्येकजण 100 खरं सांगतच नाही. मी मानवाच्या पायाला तेंव्हाच हात लावतो, जेंव्हा त्या माणसाचा ह्या जगातला प्रवास संपतो..  आपण मनातील प्रत्येक गोष्ट दुस-याला सांगू नाही शकत..पण आपल्याला मनात असतं कि त्याने सगळं आपल्याला सांगावं..
पण त्या प्रत्येकाच्या वागण्यामागे, काहीतरी कारण असू शकतेच नं..पण मग आपण त्या गोष्टीला महत्व देतो..आणि ज्याला महत्व द्यायचे आहे, त्या गोष्टीला आपण तेंव्हा महत्व देऊ शकत नाही..ज्याचा विचार करायचा असतो, त्यासाठी आपल्याला आपला वेळच पुरत नाही..
उदाहरणार्थ- एखाद्या वेळी एका व्यक्तीने स्माईल नाही दिले, तर त्याचा विचार करत बसू नये..

आपला जसा मुड आहे, तसाच मुड समोरच्याचा ही असेलच असं नाहीये..
दोन महिन्याच्या लहान मुलाला ही त्याचे मुड असतात, तर मोठ्या माणसाला ही मुड असुच शकतात..

एक सांगतो..नवरा चक्रम असेल किंवा बायको भांडखोर आहे..पण ते चांगले असतील..तर समोर भांडण होत असेल तर आपण गप्प बसावं..असं एकदा करून बघा..आपण response (प्रतिसाद) द्यायचाच नाही..भांडून कधीच प्रश्न सुटतच नाही..म्हणून एकाने तरी शांत रहावे..जर आपली भांडखोर माणसाशी भेट झाली, तर जर त्याने चालु केले तर आपण शांत राहायचं..म्हणजे त्या माणसाला भांडण्याचे मुद्देच मिळत नाहीत आणि मग तो माणुस स्वत:च गप्प होतो..

चक्रम म्हणजे विक्षिप्तपणा! म्हणजे हवे तसे वागून समोरच्याचा विचार न करणे..अशा माणसाचा विचारच न करणे..अशा वेळी ती व्यक्ती आली, तर दहा हात लांब रहायचं..पण जर ती व्यक्ती नेहमीच्या वेळची आहे, तर जास्त न बोलता त्याला इतर कामामध्ये बिझी ठेवायचं..आणि त्या व्यक्तीशी बोलायचं असेलच तर आपला आणि त्याचा संबंध येत नाही अशा इतर गोष्टीचा विषय काढायचा..म्हणजे अमेरिकेचे राजकारण..

पण अशा व्यक्तीचा जर आपल्या घराशी संबंध येत असेल तर आपल्याला जे छान वाटतं ते करून त्याला सांगायचं की मला आवडतं, मी केलं..तुला नाही आवडत तर असू दे..असं बोलून शांत रहायचं..

घरामधे जास्त 'मौन' ची भाषा चालू असते..
1) ह्या व्यक्तीला कमी बोलायला आवडतं.
2) हा माणुस बाहेर बोलतो पण घरी नाही
3) पण हा माणुस कधीच जास्त बोलत नाही, मग
     त्यावेळी त्या व्यक्तीला काय आवडतं, त्यावर
     बोलायला शिका..

मुलं बोलत नाही..ते पालकांशी बोलायला घाबरतात. पण तेंव्हा आपल्याला त्यांना बोलतं करायला प्रयास करावे लागतात..आणि मग जर तरीही ते नाही बोलले, मग देवाला सांगायचं की "देवा माझे प्रयास थकले..आता पुढचं बघ तुच..

ज्या व्यक्तीला बोलतं करायचं आहे त्या व्यक्ती समोर त्याला आवडणा-या गोष्टींवरून एक-दोन वाक्य बोला..म्हणजे त्या व्यक्तीला एक न एक तरी वाक्य बोलावं लागतंच..
जर एखाद्याला भावना व्यक्त करता येत नसतील..तर आपण कसं ओळखायचं?

ती जी कोणती व्यक्ती आहे त्याच्या मनात जे चालू आहे ते आपल्याला, त्याला समजुन घ्यावं लागतं..मग ते फक्त एकाच माणसाने करायचे असं नाही..पण त्यासाठी ही एक limit (मर्यादा) असते..कारण आपल्या future ( भवितव्या)साठी..

प्रयास कुठवर करायचे आणि किती करायचे..असा कठोर निर्णय घ्यावाच लागतो..कारण शेवटी प्रत्येकाचे आयुष्य हे स्वतंत्र आहेच..जीवनातले प्रत्येक प्रश्न आपल्याला स्वत:चे स्वत: सोडवायचे असतात..

गाडीचा अपघात होताना जर दहा जण मृत झाले, तर ते एकाच वेळी मरत नाहीत..मृत्यू लोकात येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रत्येक जण एकत्र येऊ किंवा जाऊ शकत नाही..

"घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी हे त्यानीच प्यायला पाहिजे.."

माझ्या जीवनात सगळे जण आहेत..तरी मी हा एकटाच आहे..आणि माझ्या बरोबर माझा तो परमात्मा आणि त्याची आई..म्हणजे मी एकटा कधीच नाही..तर आम्ही तिघे आहोत..इतर जण आपल्या बरोबर आहेत पण त्याची खात्री नसते..पण परमात्मा आणि त्याची आई माझ्या बरोबर असतेच असते..

आपल्याला कल्पनाच येत नाही की काल पर्यंत आपल्याशी बोलणारी व्यक्ती आज बोलत नाही..हे ज्याला त्याला दिलेलं कर्म-स्वातंत्र्य आहे ज्याचा तो वापर करत असतो..म्हणुन आपण पण तसा विचार आपल्यासाठी केला पाहिजे..

माझी स्वत:ची अपेक्षा काय आहे..एक 'बाप, आई, नवरा म्हणुन माझी अपेक्षा काय आहे? हे बघा, हल्ली मुली, मुलगा वेगळा असेल तरच लग्न करणार..का? आज 27 वयापर्यंत त्या मुलाला, तु (वधू मुली ने) वाढवलेस का? नाहीच!
चांगले भक्त इतरांसाठी compromise (तडजोडी) करतात..आणि नंतर मग काही वर्षांनी त्याची जाणीव होते..असं करू नका..

मला माझ्या जीवनात नक्की हवे काय? हे मला माहीत पाहिजे..एकदा एक माणूस येतो, त्याला एका कंपनीत चांगला जॉब आहे..आणि दुसरीकडे 5000 जास्त मिळणार म्हणून नवीन जॉईन केला..पण नवीन जॉब वरून काही महिन्यातच काढून टाकतात..आपण लहान गोष्टीसाठी एवढा विचार केला..म्हणजे 5000/- जास्त मिळणार म्हणून...

समोरच्याने आपली काहीच चुक नसताना आपला अपमान केला आणि मग तेंव्हा आपल्याला त्या माणसाला विचारता आलं पाहिजे की माझी काय चुक आणि तु मला असं काय बोलू शकतो?? असं विचारता आलं पाहिजे..

एकत्र कुटूंब हे विभक्त कुटूंबापेक्षा नेहमीच चांगलं!

Ego (मी पणा) आणि self respect (स्वाभिमान) ह्यात फरक आहे..कोणी आपला self-respect (स्वाभिमान) ठेचत असेल तर त्या माणसापासुन लांब रहा..पण आपण तसे वागतो का? हा विचार ही करायला हवा..आणि तसे आपण वागत नसू तर समोरच्या व्यक्तीचं काहीच मनाला लावून न घेता पुढे चालत राहिलं पाहिजे..आणि मग तो अत्याचार सहन करू नका..

"स्वत:चं स्वत्व गमावुन बसू नका"

काही लग्नं नुसत्या संसारासाठी टिकुन आहेत..भरपुर try (प्रयास) करुन पण लग्न टिकत नसेल..तर तोडा नं..खोटी नाती ठेवुन काहीच ऊपयोग नाही..जर एका बहिणीला 100 भाऊ आहेत पण त्याना बहिणीची पडलेलीच नसेल, तर काही गरज नाहीच..एक भाऊ आहे आणि त्याला बहिणीची काळजी असते त्याला जपा..

आम्हाला बापू किती वेळा आठवतात हे ही मी बघतो...माझ्याकडे काही तरी नक्कीच सिस्टीम्स आहेत..माझ्याकडे दैवी शक्ती नाही..पण माझ्याकडे खुप गुप्तहेर आहेत. जगाची लोकसंख्या किती आहे, तेवढे गुप्तहेर आहेत..मग मला कळतं की मला (बापूना) हाका मारतात..

एकदा स्वत:ला बदला..पण असेही बदलू नका की आपण स्वत:लाच ओळखु शकणार नाही..अशासाठी बदला, पण ज्याची किंमत समोरच्याला नाही, तर काय बदललात?

माझ्याकडून एक चुक झाली, तर झाली नं, पण तो माझ्या फोटोसमोर ऊभा राहून रोज सांगतो! एक वेळी मला कंटाळा येतो..एकदा सांगितल्यावर मला (बापूंना) कळतं! माझ्याशी कपट करू नका..कारण मी (बापू) जगातला मोठा कपटी माणूस आहे..मी जराही मुर्ख नाही..जर मुर्ख असतो तर आजपर्यंत टिकलो नसतो..मला कोणी काहीही करू शकत नाही..मी कोणाच्या बापाला घाबरत नाही..गेले वर्षभर मी ज्याच्यासाठी लढतोय त्यानी मला काहीच कमी केलं नाही..मला 'त्याच्या' कडून काहीच नकोय..कारण मी त्यांच्या विरोधात काम करणारच आहे..
तुम्ही सतत ती चुक सांगत बसतो! का असं? त्याला एकदा सांगितल्यावर कळतं सगळं..

"भारतामध्ये कोणाला ही धर्मबाह्य होण्याची भीती नाही वाटत पण जाती बाह्य होण्याची भीती वाटते"

मनात येतं कि माझे गाववाले काय म्हणतील, आणि जातवाले काय म्हणतील..आपण काय करावं..कुठे जायचं, हे आपण न ठरवता इतर लोक का ठरवतात?? बंधनं असली पाहिजेत..पण त्या बंधनांची बेडी झाली नाही पाहिजे..
तुम्हाला कधी पैशाची गरज पडली, तर गाववाले वर्गणी काढून आपल्याला देतात का? नाहीच नं? मग हे सर्व आपण म्हणतो कि आपले गाववाले आहेत, कारण ते आपला आधार आहेत..पण ते खोटे आधार आहेत..खरा आधार एकच.."तो परमात्मा आणि ती आजी"..

लोक काय म्हणतील हा विचार करायचा सोडून द्या..कारण गरज पडल्यावर कोणीच नाही येत..येतात ते फक्त आपली आजी आणि परमात्मा..

सगळी माणसं वाईट आहेत असं नाही पण स्वत:साठी सुध्दा जगायला शिका..कोणत्याही गोष्टीने कर्मठ बनू नका..टोकाची शिस्त पाळून काही नाही होत..पावित्र्य हे प्रमाण ठेवुनच आपल्या आजुबाजूचे नियम मोडावे लागतात..पण ते नियम मोडताना इतरांना त्रास नाही ना होत, हे बघा...

देवाने कोणतेच नियम लावले नाहीक..पण माणसाने माणसाला लावले आहेत..बेलगाम पणे वागू नका..आपला लगाम/वेसण दुस-याच्या हातात का?? आपल्या गळ्यात कोणाची वेसण असता कामा नये..प्रेम असताना पण कर्तव्य असल्यावरच केलं पाहिजे..पण सतत नाही..आपल्याला हा निर्णय हा घ्यावा लागतोच..मग शेवटी देवाला सांगावं लागतं कि, देवा हे डोक्यावरचं वजन कमी कर..पण आपणच ते वजन आपल्या डोक्यावर घेतलेलं असतं..

तुम्ही सगळी चांगली माणसं आहात पण मग आपण आपल्या वजनापेक्षा जास्त वजन डोक्यावर घेऊन फिरत असतो..स्वार्थ शिकून स्वत्व जपा..
आपल्याला आपला विचार करून आपली प्रगती करणे गरजेचे आहे..प्रगती म्हणजे, पैसा नाही; तर मला मिळणारा आनंद, आपले काम चांगले होणे..

आपल्यावर आपल्या जबाबदा-या आहेतच पण त्या ही किती घ्याव्या ते आपल्याला कळले पाहिजे..कधीही कोणाचं चांगलं केलंत तर ते बोलून दाखवू नका..मग आपलं पुण्य झिरो होतं आणि तेंव्हा आपल्यातलं प्रेम गेलं आणि ते नातं प्रेमाचं न ऊरता ऊपकाराचं नातं होतं..म्हणजे "दे दाता" असं भिकारी चं नातं बनतं..
मग तेंव्हा समोरच्या माणसाला आपल्याशी जवळीक तयार होत नाही..
आई वडिल आपल्या मुलांसाठी करतात त्याला त्याग नाही म्हणत..पण मुलाना ते बोलून दाखवणे चुक आहे! पण मुलांनीही हा विचार केला पाहिजे की आई वडिलांवर ही वेळ का आली, सांगायची?

अवघाचि संसार मधे एक लक्षात ठेवा..कि लाचार होऊ नका. जरी त्यातुन मोठा फायदा होणार असेल तरी तो कमी दर्जाचा आहे..जो पर्यंत देहात श्वास आहे तोपर्यंक लाचार होऊ नका..बापू सगळे दरवाजे बंद झाले..पण असे नाही होत!

हरि अनंत.हरि द्वार अनंत...

हरि अनंत आहे आणि त्याचे दरवाजे ही अनंत आहेत.. स्वत: लाचार होऊ नका आणि इतरांना ही लाचार करू नका..आई वडिलांना सॉरी किंवा थँक्स बोलू नये..तर "आय लव्ह यू" म्हणा..दोन्ही वेळा..

लाचार कोण असतं, तर प्राणी योनी..जो चोच देतो तो दाणा ही देतो..त्याची कृपा आपल्यावर आहेच..तो मार्ग दाखवणारच आहे..देवा पुढे कधी लाचार होऊ नये..बापासमोर लाचार होताना देवाला किती वाईट वाटत असेल हा विचार करा..जे हवं ते हक्काने मागा..बिंधास्त बोला..
फोटो मधे जरी तो असला तरी आपल्या दुख:मुळे तो अजुन दुख्खी असतो आणि आपल्या आनंदामुळे तो चार पट जास्त आनंदी असतो..आम्ही कोणावर अन्याय करणार नाही..माझ्यावरचा अन्याय सहन करणार नाही..माझा देव माझ्या पाठीशी आहे.

Pravachan on 22nd January

Hari om
Date - 22-1-2015
Hari om
Avghachi sansar sukhacha karen..
Sanwad pahila...
Aplya ajubajula ji manas ahet...
Ek prashn apan swatala vicharayla hava...aapan apli sagli gosht samorchala sangto ka..manatle vichar...dararoj rahto..tyana...sangto ka..?
M apan samorchakdun ka apeksha karto?
Jya arthi prateka vyakti swatantrya dil ahe...
Konch saglya goshti sangat nahi...yala apvad nahi...108% ...
Aplya khup gosht astat...pn apan nahi sangu shakat..hech apan samjun ghetal pahije samorchach pn..
Pratek veli karan nasat...n apalyala karan shodhat basto...
Apan tyach goshticha vichar karun apan tya goshticha ..barik sarik goshtincha vichar karaychi kay garaj...?
Jya goshticha karayla hav..tyasathi velach rahat nahi...
Kahi kalane tatpurta badal hoto...eg.mitr kadhi olkh n dakhvta Gela...
Apan apla vichar karun baga...ekhadya goshtich nairashya asat..apan konashi bolat nahi...m he itarana vatu shakat nahi ka?...
Maza gharatlya vyakti cha mud mazasarkha hava as kas hoil...?
Jasa tumhala mood asto tas pratekala ap apla mood ahe...
Pn kahi lokanacha mood nehmi tirkasch asato m kalat nahi kas vagaych ?...
Eg.bayko bhandar asel...tr as samjaych ki ti bhandat nahi...shant rahaych...tila bhandu dyav...response dila nahi ki...50% power tithech kami hote...bhandun  kutchach problem sutat nahi...
Aapli mandali bhandat astil tr shant rha...indhan purvaych thamba..
Chakram pane wagane...samorchacha vichar n karta...swatala vatel tasa vagto...
Hyanchashi vagtana..mojkach bolaych... Ashanshi bolaych asel...tr aplyashi kahi sambandh nahi asha topic var bolaych..n bolaych ha tuzach khar.. As chakram vyktishi vagaych...
Ti vykti tika karat asel...tr bolaych ..tula nahi avadat...m MLA karude...asha veli bolaych...
Vyakti titkya pravrtti..
Maunachi bhasha ...ashi vyakti asel tr...asha lokana konashi bolayala avadat nahi...kiva aplyashich bolat nahi...tr shant rha..pn konashich bolat nahi tr...tya vyaktila kay avadat...tya topic var bola...tyana bolat kara...
Pn samorchi vyakti bolat nahi tr prayas karayla hav ..pn kahi farak nahi padal tr m devavr sodaych...
Pn aplyala prayas karat ja asti...
Sanwad karan vegal n konala bolat  karan vegal
Kahi lokana bolata yet pn express karta yet nahi...ashi vyakti Premal aste...
Ti vyakti bhavna rahit ahe ka...he aplyala pahav lagat...
Bhavana olkgaycha kasha...?
Tya vyakticha dolyatun krutitun...tumhala janavat asat...
Kahi jan express karuch shakat nahi ..tyaveli aplyala samjun ghyav lagat...n prayas karun hotch nahi teva aplyala thamnav lagat...
Prayas kutvar karayche...he aplyala kalayla hav..
Apal ayush changal karnyasathi...
Jivmatle swatache prashn swatala sodvave lagatat...
Pratekacha baher janyacha marg swatantr ahe..
Pratekachi bhakti vegali...
Eg.upasna ...n goli ...
Tap jyala Alay tyanech goli ghyayala pahije...
Pn maza jivnat mi ektach ahe ..pn amaza sobat .
Aplya sobat apan swata..maza to baap..n mazi aaji mothu aai
Aniti kadhihi karnar nahi...pn same time...mi je kahi karto ..maz mi swatal akar det asto...
Ek bayko mulga ..mhnun..mi kay karto...
Kahi muli...vegla asel trch lagn kartat...jas tumhi vagta..tas tumchi Mul vagan..
Khup lok..nko tevde adjustment kartat...compromise kartat...he houn deu nka...
Mi ektr kutumbacha ahe..108 %
Ek Mahit pahije...mla maja jivnat havay kay?
Apan eka goshti sathi mothe nirnay ghetat...
Sadhya goshti sathi nirnay ghetat..
Faktan konacha insult karatat..ka karaycha?
Namratene bolta aal pahije...yes he bolta aal pahije...
Swta jar tumhi vagat asal tr tumhi bolu shakat nahi..
Mukhya ego mhnje Ahankar
N self respect mhnje abhiman.
He samjun ghya tya pramane rha..
Dusaryala apan sangto teva apan swata karto ka ...
Swatach Swa tva ghalau nka..
Tumhaala kon varavar tokat asel...tr tithe toka...
Samaj kay mhnel?...kahi jan lagn 2 mahinyat todtat...te murkh...
Pn kahi jan vinakaran varshanvarsh nati tikvatat...
Apan je lahan sahan je nirnay gheto...teva tyacha khup motha parinam hoto...
Dusryala samjun ghya...samorchala Avadhi pn dya..
96 pasun Bapu bolto...m apan sudharlo ka?
Apalyala kahi athavat nasat gelya gurvarch ya gurvari...
Bapu kiti athavato...apan?
M apan bolto MLA badlayla pahije...
Evde pn badli nka ki mi maza mlach olkhnar nahi...
Prem he nehmi samartha karnar ahe..
Lok ek chuk zali ki ek ek mahina mafi magat asti...mla kanatala yeti...
Maza evda charsobis chalu manus yumhala shodhun sapdnar nahi...
Tumchi khandani..khup mothi...
Mi murkha nahi...murkh asti.tr evda tiklo nasto..
Evdya saglyancha virodh patkrun..
Mi tyanch hotch pahto..
Tumhala ekch picture roj pahayla sangitla chalel?m MLA nahi yenar ka kantala? Tumhi ekch chuk roj sqngta...
Apan asha nko tya goshti swatala chitkun gheta...
Bhartat konalahi dharmbhahya vhaychi bhiti vatat nahi...
Jat vale kay boltil ..n gav vale kay boltil...
Pn amach javan kashavar depend ahe...
Manya ahe bandhan asatat..pn bedya nahi zala pahije...
Ti manans tumchi Tanta dur kartat ka?tumch karj fedta ka...
Pn aplyala yachch adhar vatato
Kutetari swata jithe pahije tithe..band karayla pahije..
Lok kay mhantil he sodun dya hech MLA tumch sangaych ahe
swatasathi pn jagayla shika...rajano...
Karmath banu nka..shist pala...niyam palun nahi jagu shakat
Jagamde jagtana..palyala niyam pn modave lagtat..
Devane Kasle tayar kelet ?Kasle nahi...
Belagam pne vaga as mi mhanat nahi pn apla lagam dusryacha hatat ka?
Samorchacha vyaktich prem ahe na..m tyachasathi badala...pn kartvyasathi...jevad tevadch badla...
Nko tya bedya kashasathi...
Lok kay mhantil...???.pati gelelya vyakticha manat picture bagaych man zal tr...kay farak ahe...lok kay tich dukh kami karayla yenar ahet ka ?ka tyancha vichar karaycha?
Lok kay vatel te mhnu de...
Swatacha dokyavar kondi karun gheta...pn swarth shika..
Pn tyane dusryala tras hota kama naye..
Maz dhyey pragati karnar asal pahije..
Mhnje maz samarthya man shant hot ahe ka ..he aplyala shikal pahujije...
Nit jagayla shika...nkotya goshticha vichar karu nka..nko tya jabadarya gheu nka..
Kadhi konach changal kelat tri te bolun dakhau nka...
Te kadhich bolu nka..jevha bolta..teva tyachi value 0 hote..
Tyasamor bolat..tyat nat rahat nahi...
Apan konasathi kahi karto te sagal tya devacha charnashi jat...
Samja MLA patr pathavaych asel...tr ...post peti ekch...pn je jyacha tyala jatch..
Konach kahi chanagal kelat tr konasamorhi te bolun dakhau nka...
Aai vadil mulansathi kartat te tyag nahi...kartavya nahi tr te prem asat..
Apan changal vaglo...to nahi vagla...pn maz patr tyala milat..
Avghachi sansar...
Kadhihi lachar banu nka...
Fayda honar asel trihi..
Jo paryant sehat shwaas ahe...tri lachar banu nka...
Hari dvar ananta...tyache darvaje ughade aastat...
Swatala lachan samju nka...n samorchala banau nka

Aai vadlana sorry thanks bolu nka..love u bola.
Apan prani nahi...
Jo choch deto...to danahi detoch...
To marg kadun denarch ahe...
Jar apan tyala baap manto...tr tyacha samor lachar hou naka..
Premane maga hakkane maga...
Karan lachar banto..teva apan tyala Dukkha deti
Yes...lachar bananar nahi..anyay sahan karnar nahi...n anyay karayla denar nahi...
Avghachi sansar sukhacha karen..
Yasathi awashyak vakya...
Yes jyane ha sadguruncha payabar hath theun ha vichar kara...
Aplya mansashi vagtana...Upkar ha shbd yeta kama naye...nahitr te 0 hot...
Manushya jeva javal asatat...teva mithyane bolto...bhandto...
Prapanch kara..swatacha bali deu nka n konacha gheu nka...
Hari om

Vaijayantiveera Shelar
Ambadnya