My Blog List

Thursday, December 22, 2016

ओम् विचित्रकनकउज्वालय नमः

# ऐसा सोना जो पाहिले कभी ना देखा  ऐसें सोने को जो प्रकाशित काइतिभाई , ऐसें राधाजी को मेरा ओरानं है
# चरक मुनी - आयुर्वेद - औषधी वनस्पती धुंध्रहे ठे #  vidhyachal - meet aadivasi - bhill lady 90 years old - charak ask what u r s3archinb - what knowledge u have - I will tell u whatever I have- charak stay with her - old lady went away - 2nd night - charak do treatment - not workable - old lady give same medicine to patient and he cure -
Lady says medicine works with mantra -
Mantra not is sanskrit - " he radha ma , ye dawa nhi , tere charno ka tirtha hai "
Charak become happy - he says you r my guru -
  After some time while leaving charak saya to old lady ... Ask what u want , knowledge ?
(Old lady ask ... Give ne 1 thing ?
If u don't have , u will get ,and give me that
Charak : what
Old lady : i want vichitra kanak

Charak : went to king and bring
Old lady : i dont want this. ..i want vichitra kanak .
Charak : i dont know , what is vichitra kanak
Old lady ;: i dont know , u give me then only u go

Charak think a lot ...
Charak :
Old lady : vichitra sona i have , and I want ,it for you ... This sona i can't give u , but I want that u have this sona

Charak start praying god dhanvantari

Charak : vichitrakanaak ?
Dhanvantari : isi sone ke khoj me me nikal pada , aur khoje khojte aaurvedic utpanna hua . When I submit this to pepokj ....I got this.

Charak : what I do ?

Dhanvantari : submit your all knowledge to people .

Charak arpan all knowledge to dhanvantari

At same time all world start lighting like gold . ....trees , river , sky , dear ,
Even the old lady

Charak : you r my maa
Now I know ,

Old lady : still u didint get

But see yourself ....

Your body is like gold ...see god in yourself .
All this happens due to Radha ...
Suvrnakanti is Radha

Charak says ....who r u

Old lady ... Vichitra suvarna mere hi charan kamlo se nikal ta hai ....

Hence



Har ek jiv me bhagwan ka ansh hai . Even in paapi. But pavitra ke paas god is active . Even we don't know. ..we have inner gold.
This aabha only give by radha .
But when., Charka dedicated his ego and his knowledge .

We r common people .eg  We have good tv  but if you don't have electricity ...is it useful ?

Bhautik suvarna se jyaada , we need vichitrakanaak

Only radha ji can do this
Cause she is only aalahadini shakti

How we can get this ????

Hence , 3 ways to get this

1. Suvarna vanchit pipilika marg

Suvarna ki wish karne wali chiti .
Mungi udaali aakashi , tine gilale suryashi

Check 1 chiti take ...how much she take tine walk by setting clock
Then take ratio
2feet /2 multimeter

Then count your height then count
As per your weight
Then you will come to know
She walks faster than us

We always wants chamatkar
But chiti - jyaada bhaar vo uthati hai

Hum jitni bhakti kar sakte hai usse 10 guna karna chahiye
.
Kabhi aise na kahena ...mene bahot bhagwan ka kiya
Ulta kahena ....muze aur lena chahiye

2. Seeta mohit mrug tyaag marg

Seeta moh by kanchan mrug then she suffer lot of dukh
Hence zhootha sone ke moh ka tyag karna chahiye .

Zhoota hai uske piche mat bhaago

Vishwa ka antim satya bhagwan hai

If zhoota sona seeta ke liye problematic ho sakti hai to apne ke liye kitna ho

If we know galat kaam karna pad raha hai....to bhagwan ko kaho

Imaandaari se karo , jo karo ..

Business ho ya job

Zhooti kirti aur sanmaan ke piche mat daudna ....

Apmaan sahan karna aasaan hai but stuti pachana mushkil hota hai ....it increases ego

Koi stuti kare to .... Ambadnya kahe na

Every time says ....lahanpan dega deva....

If people is giving you respect then it's god

3. No one can found , what going in his or her mind

Manguptkanakmarg

Mangupt : man jaha gupta ho jata hai , man. Jaha shaant ho jaata hai aisa suvarna , aisa sona

Yani
Manshanti is real sona

Man ko gupta karo
Man shant karna imp hai
Man shant karna ke liye man namah hona chahiye

Manshanti pane ki koshish karo
Ye tabhi hoga
Jab aap dusro ko shanti doge

Laxmi ji ke haat se niklta hai , vo vichitrakanaak hi hai

We have to go by this 3 ways

Missing advertising # by radha ji

Tuesday, November 29, 2016

बापूंचे रामरक्षेवरील प्रवचन -31

प. पू. बापूंचे रामरक्षेवरील प्रवचन -31

हरिओम

आपल्याला एक छान सुंदर गोष्ट सांगायची आहे. कोजागिरी पौर्णिमेला मी

कोठींब्याला गेलो होतो, कशासाठी? काही जणांना माहीत असेल. मी चार साडेचार वर्षांपूर्वी मला जशी द्वारकामाई होती तशीच द्वारकामाई पाहीजे हा विचार मांडल्याबरोबर समीरदादा कामाला लागले

साईचरित्राचा साईलीलांचा अभ्यास केला.

द्वारकामाई जशी होती तशीच मांडायची होती. मंडळी कामाला लागली. त्यात मुंबईच्या दसपट मुसळधार पाऊस, त्यामधून जशीच्या तशी अगदी dicto, जिवंत द्वारकामाई तशीच्या तशी उभी राहीली. अगदी जिवंत द्वारकामाई! मुंबई पासून कर्जत फक्त दोन तासांच्या अंतरावर आहे. जवळ आहे.कृष्णाला भेटायला, पादुका बघायला परत परत जा.

द्वारकामाईत बसा. शांत बसा, गोंधळ घालू नका. साईचरित्र वाचा, बाबांच्या फोटोकडे बघा, कठड्याकडे बघा. कुठे फळी टांगली असेल, हाजी कसा आला असेल, वाघाने त्याची शेपटी कुठे आपटली असेल, साप चावल्यावर शामा कुठे बसला असेल? हेमाडपंत बाबांना कसे भेटले असतील. ती जिवंत वास्तू आहे, कृत्रिम नाही. कृष्णाच्या मंदिरासमोर गरुड स्तंभ आहे. मंत्रांची विशिष्ठ संख्या झाल्यानंतर पाप विमोचक बिंदू स्थापन झाला आहे, त्याचं दर्शन घेतल्यावर पापक्षालन होतं. स्तंभावर गरुड हनुमंत आहेत, एकाने विष्णुला वाहून घेतलंय, दुसयाने रामाला. गरूडावरी बैसुनी माझा कैवारी आला.

द्वारकामाई बनवताना मजा आली, ऐकताना छान वाटलं. दिव्याची काजळी दगडी भिंतीला लावली,effect येण्यासाठी ! किती काजळी जमा करावी लागली असेल, विचार करा! किती कष्ट करावे लागले असतील! शिळा पण तशीच ! कठडाही तसाच! धूनी पण तशीच! वास्तूच बदलत गेली, ह्यामधे त्यांचं प्रेम होतं, श्रद्धा होती. मुंबईपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर. जो राहण्यासाठी जाईल, ती व्यक्ती रात्रभर द्वारकामाईत बसू शकते ह्याची सोय केली आहे. फक्त वर जाऊ शकणार नाही, तिथे साखळी लावली जाईल. आत जाऊ शकणार नाही. बघा, भूतं रात्रीची येतात, कदाचित खूप मोठ्ठं भूत येईल, साधं सुधं नाही, महाभूत असेल, जाऊन बसा. किती सुंदर गोष्ट! 'कोण हतभागा माघारा जाई' ,मिळतंय तर घ्या राजांनो ! जा. तिथे बसा. काही मंडळी म्हणाली, बापू, द्वारका माई मधे दीपोत्सव साजरा करण्याची मुभा द्याल का?तर ठीक आहे,

प्रत्येकाला दिवे लावता येतील. जो गरूड स्तंभ आहे, त्याबरोबरच पापविमोचक स्तंभाला प्रदक्षिणा घालता येईल.

अजून एक सुंदर गोष्ट -

आठ दिवस मी नुसता फिरतोय रात्रंदिवस ! मंडळी वहया लिहीताहेत. मी गाडयांवरून पण फिरलो, नक्की काय चाललंय बघायला, तर प्रेमाने वह्या लिहीत

आहेत. लहान मुलं, म्हातारी माणसं! काही जणांच्या 2 / 2 वह्या झाल्यात. बरेच जण आसुसलेले आहेत. एक चौदा वर्षांचा मुलगा व अकरा वर्षांची मुलगी त्यांच्या बाबांना सांगतात, बाबा आमची वही तुमच्या आधी पूर्ण झाली. हा जो स्पीड आहे ना, तो असाच राहू देत, अधिकाधिक छान होवू देत. त्यात प्रचंड सामर्थ्य आहे. राम आहे, श्रीराम जयराम जय जय राम आहे, कृष्ण आहे, दत्तगुरु आहे.कोणीही श्रद्धावान उष्ण,स्निग्ध, रुक्ष गुणांचा असू देत, संत असू देत, की महापापी असू देत, प्रत्येकाला जी रचना हवी ती रचना त्यात आहे. कुठल्याही क्रमाने लिहू शकतो. शुद्धलेखन चुकलं तरी सगळेच्या सगळे फायदे मिळणारच आहेत. पानांची संख्या, जप संख्या ह्याची रचना अशी रचली आहे की त्याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे, प्रत्येक पानावर चित्र आहे, त्यामागे विशिष्ठ संकेत आहे. हनुमंताचे चित्र आहे, त्यामागे विशिष्ठ संकेत आहे. आपण त्यावर रामनाम लिहीलं की हनुमंताच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आमच्या कडून एक पान लिहीलं गेलं की सहा वेळा हनुमंताची परापूजा होते.परापूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा आहे. आधी मूर्ती पूजा, मग मानस पूजा नंतर परापूजा. म्हणून रामनाम वही लिहीत राहा. हरिओम.

आता आपण बघत चाललो आहे -

मध्यं पातु खरध्वंसी -

मागच्या वेळेस खर राक्षसाचे दोन सेनापती बघितले, एक शंख करणारा व

दुसरा कापालकौशिक.

आज पुढचे जुळे भाऊ बघायचे आहेत धुम्रगंध व धुम्रवदन. धुम्र म्हणजे धूर. धुम्रगंध म्हणजे धुराचा वास तर धुम्रवदन म्हणजे धूरकटलेला चेहरा. हे दोन्ही खर राक्षसाचे सेनापती आहेत.

आपल्याला धूम्रगंध व धूम्रवदन कोण आहेत हे बघायचे आहे. जिकडे धूर आहे तिकडे अग्नी असलाच पाहीजे. पण जिकडे अग्नी असेल तिकडे धूर असेलच असे काही नाही. जेव्हा अग्नी पेटतो तेव्हा धूर कमी होतो. लहान मुलाच्या डोळ्यात काजळ घालतात, ते देवाच्या दिव्याच्या काजळीपासून तयार करतात, तो धूर चांगला. आम्हांला अग्नी हवा असतो पण धूर नको असतो. यज्ञाच्या वेळी ऐरणी मंथन पद्धतीने लाकडावर लाकूड घासून अग्नी तयार करतात. तो पवित्र अग्नी असतो.

आम्हाला अग्नी हवा असतो पण धूर नको असतो. अग्नीबरोबर येणारी अपरिहार्य गोष्ट म्हणजे धूर. धूर अग्नीमुळे उत्पन्न होतो. शास्त्रीयदृष्टया अग्नी ज्या पदार्थांना जाळतो, त्यातून धूर उत्पन्न होतो. अग्नी ज्याला जाळतो त्यापासून धूर उत्पन्न होतो, अग्नीतून धूर उत्पन्न होत नाही हे लक्षात घ्या राजांनो! म्हणजेच धूर चांगला की वाईट हे कशावर ठरेल, तर आपण काय जाळतो त्यावर! धूर जो आहे त्याचं चांगलं वाईटपण अग्नीवर ठरत नाही जे जळतं त्यावर ठरतं. आपल्या शरीरात अग्नी आहेच, त्यापासून निघणारा धूर म्हणजेच आमच्या प्राणाग्नीपासून निघणारा धूर म्हणजे "धूम्रवर्ण".

हे गणपतीचं, गणेशाचं, विनायकाचं नाव आहे.

जो वाईट धूर निघतो तो धूम्रगंध व धूम्र वदन. हे खर राक्षसाचे सेनापती आहेत. आमच्या प्राणशक्तीच्या चुकीच्या वापरामुळे हे निर्माण होतं. थंडीमधे हातावर हात घासतो, उष्णता निर्माण होते.

काही लोक म्हणतात Dr brandy मुळे उष्णता निर्माण होते. लहान बाळाला सुद्धा देतात. त्याला उलटी होते, मग म्हणतात कफ पडला असेल. अरे, ती दारू आहे, बाळाला सोसत नाही, acidity होते. वर्षानुवर्ष ही वाईट गोष्ट चालू आहे, मग मुलांना तीच सवय लागते.

व्यायामामुळे उष्णता निर्माण होते. उष्णता आहे म्हणजे गती आहे, हालचाल असेल तर उष्णता आहे, हालचाल नसेल तर उष्णता नाही. फ्रिज मधे हात ठेवू शकाल का? उष्णता आहे म्हणून हालचाल आहे. हालचाल नसेल तर वजन वाढतं.

कर्मेंद्रियांचा वापर अग्नीमुळेच होतो. कर्में द्रियांच्या कार्यासाठी उष्णता आवश्यक आहे.आमच्या कृतीने प्राणमय, मनोमय देहाला गती प्राप्त होते. आमच्या ज्ञानाग्नीला जेव्हा अनुचित कार्यासाठी वापरतो, तेव्हा अग्नी धुमसतो. अग्नी उत्पन्न होत नाही तर धूर निर्माण होतो. असा धूर म्हणजेच धूम्रगंध! आम्ही आमच्या कर्मेंद्रियांच्या केलेल्या अनुचित वापरामुळे मिळणारी शक्ती कमी होते. आम्ही आमची कर्मेंद्रिये चुकीच्या पद्धतीने वापरतो त्यामुळे अग्नी दिशा बदलतो, ताकद कमी मिळते, धूम्रगंध आमची ताकद हिरावून घेतो, आमची potency,competency हिरावून घेतो.

गंध हा पृथ्वी ह्या महाभूताचा गुणधर्म आहे. प्रत्येकाला गंध आवडतो. कर्मेंद्रियांच्या चुकीच्या वापरातून जो धूर निघतो तो म्हणजेच धूम्रगंध. प्रत्येक धूराला वास असतो. ह्या धूम्रगंधाला एवढा वास असतो की धूर यायच्या आधीच वास येत राहातो. धूर उत्पन्न झाल्यावर वास येतो, ज्या क्षणी धूर यायचा थांबतो त्या क्षणी वास पण थांबतो. जेव्हा कर्मेंद्रियाचा  अनुचित वापर करायला लागतो तेव्हा त्याचा वास आपल्याला यायला लागतो. आमच्या मनामधे संशय यायला लागतो. आमच्या मनामधे परमेश्वराविषयी संशय यायला लागला की कर्मेंद्रियं चुकीच्या दिशेने काम करतात. हा संशय म्हणजे धूर. हा मनातला जो विचार आहे तो म्हणजेच धूम्रगंध. मनामधे श्रद्धा कमी होते. पैशाचं सोंग,धनाचं सोंग, श्रद्धेचं सोंग आणता येतं पण सबुरीचं सोंग नाही आणता येत, भांडं फुटतं. आमच्यामधे पोकळी निर्माण करतं.

त्याचा धाकटा भाऊ धूम्रवदन. याच्यामुळे नुसता वास नाही तर चेहराच धूरकट होतो. संशयाच्या बरोबर संभ्रम उत्पन्न होतो. मोठा भाऊ आधी की लहान भाऊ.

आमच्या मनामधे संभ्रम निर्माण होतो, देव नसलाच पाहीजे. देवाला प्रदक्षिणा घालताना, लोटांगण घालताना देवाला पूजा पोहोचली की नाही हा संभ्रम! परमेश्वराला शिवी पण पोहोचते, तुम्ही गुहेत बसा,दरवाजा बंद करून बसा, जंगलात जा, पण त्याला कळत नाही असं कधी होत नाही. माझी प्रार्थना पोहोचते की नाही ह्याला कळत नाही, असा विचार मनात आला की धूम्रवदन जोरदार कामाला लागला तो मला बुडवणारच हे आम्हांला कळलं पाहीजे. धूरकट चेहरा दिसतो याचा अर्थ दृष्टीमधे धूरकटपणा येतो. परमेश्वराबद्दल संभ्रम उत्पन्न होतो. दृष्टीमधे दोष निर्माण होतो. परमेश्वराबद्दल मलाच clarity नाही, तो स्पष्ट नाही असं आपल्याला वाटतं.

"तुटे वाद संवाद तो हितकारी" संत राम दासांनी सांगितलेलं वाक्य आहे म्हणजे ते खूप महत्वाचं असलं पाहीजे. त्याचा आरोप आम्ही स्वतःवर ठेवत नाही त्याच्यावर ठेवतो. संशय व संभ्रम यामुळे राम बाहेर ढकलला जातो. खर हा रावणाचा भाऊ आहे.

राम जीवनात येण्यासाठी रामनाम वही लिहावी लागते. सेवा करावी लागते. कर्मेंद्रियांचा योग्य वापर करावा लागतो. मग आमच्या जीवनात राम येतो. धूम्रगंध व धूम्रवदन यांचा नाश होतो. रामनाम व रामाची सेवा केल्यानेच हे शक्य होतं. रामनाम धूम्रगंधाचा नाश करतं तर रामाची सेवा केल्याने धूम्रवदनाचा नाश होतो. माझी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये उचित मार्गाने काम करतात.

आम्ही काळ काम वेगाची गणितं शाळेत शिकलो. एक मोठा हौद आहे, त्याला दोन तोटया आहेत एकातून पाणी बाहेर पडतंय दुसऱ्या नळातून भरतंय, वगैरे. तर किती तासात हौद भरेल? मुलांना छळणारी गणितं. पण हे गणित आवश्यक आहे, काळ काम वेगाचं.

आमच्या जीवनातील रस हे राक्षस काढून टाकतात. कर्मेंद्रियाच्या अनुचित वापराने धूर येतो, मनात संशय निर्माण होतो. ज्ञानेंद्रियाच्या अनुचित वापराने मनात संभ्रम निर्माण होतो. ह्या हौद रिकाम्या करणाऱ्या तोट्या आहेत.

रामाची भक्ती म्हणजे ज्ञानेंद्रियाचा उचित वापर आणि रामाची सेवा म्हणजे कर्मेंद्रियाचा उचित वापर. मग अनंतपटीने तो भरत राहातो.

आमच्या जीवनात या दोन राक्षसांचा नाश होणं आवश्यक आहे, नाहीतर पोकळी निर्माण होते. उदासीनता निर्माण होते. या पोकळीचा मोठा भाऊ कोण तर मी मी करणारा. रावणाचा नाश रामच करतो, खर राक्षसाचा नाश रामच करतो. रामाची सेवा व रामाची भक्ती ह्या हौद भरणाऱ्या तोट्या आहेत. ज्ञानेंद्रियाचा maximum वापर रामनाम वही लिहीण्यासाठी करा.

कर्मेंद्रियाचा maximum वापर सेवा करण्यासाठी करा. मग धूम्रगंध व धूम्र वदन हे राक्षस आले तरी तिथे लढावं लागत नाही. रामच त्यांचा नाश करतो.

परमेश्वराकडे कुणाचंही वाईट करण्याची शक्ती नाही.पण त्याचीकृपा स्विकारण्याची

सुद्धा capacity पाहीजे. त्यासाठी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियाचा उचित वापर केला पाहीजे. रामायणातील प्रत्येक घटना घडून गेलेली नाही तर प्रत्येक क्षणाला घडतेच आहे. म्हणून धूम्रगंध व धूम्रवदन यांचा नाश होणारच आहे.

 ॥हरि ओम श्रीराम अंबज्ञ ॥

   ॥जय जगदंब जय दुर्गे ॥

 ॥ सद्गुरू श्री अनिरूद्धार्पणमस्तु ॥

          ॥ शुभं भवतु॥

Thursday, April 14, 2016

दि. 07/04/2016 बापूंचे पितृवचन

हरि ॐ दि. 07/04/2016
बापूंचे पितृवचन

श्री स्वस्तिक्षेम संवाद! जो भी संवाद करना चाहते हो, अपनी दादी के साथ, चण्डिकाकुल के साथ; कोई भी बात हो! कुछ अच्छा हो, तो वो भी बतायें! पुरे विश्वास के साथ; कि जो मैं मन में बोल रहीं हूँ, वो सुनती है! मन में बोलोगे, तो ही वो सुनेगी!
आप कुछ भी बात कर सकते हो! अगर बात करना नहीं चाहते; तो सिर्फ देखते रहो। मन में उसकी मुर्ती लाकर, बैठ सकते हो; लेकिन ये संवाद है! हमें कुछ सुनाई नहीं देगा, तो संवाद कैसे? उनकी भाषा ही अलग है। उनकी भाषा पवित्र प्रेम... तुम्हारी बुध्दी के साथ, प्राणों के साथ है। प्राणमय संवाद! प्राणों में बात छोडी जाती है। मन में क्यूँ नहीं?
कोई चाहता है, कि मेरा मन बदलो! तो वो नहीं हो सकता। ये Mind Control (मन-नियंत्रित) करना; अपवित्र बात है। मन पर control (नियंत्रण) करोगे, तो कर्मस्वातंत्र्य नहीं हो सकता! अगर राम भगवान, रावण का मन बदल देते, तो बात इतनी बढती हीं नहीं!
माँ भगवती, और उसका बेटा त्रिविक्रम; हमारा मन बदलने के लिए सहाय्य करते है। वो हमारे प्राणों में ऐसे बदलाव करते है कि, हम लोगों का मन बदल सकता है! अगर कोई मन बदलने का काम करता है, तो वो गलत मार्ग है। ये आदिमाता किसी के भी मन का नियंत्रण नहीं करना चाहतीं! मानव का क्षेत्र मन ही है। सब कुछ मन में ही चलता है। इसिलिए इसी क्षेत्र में बैठकर हमें बात करनी है। विचार अपने आप मन में आ जायेगा! जो आपको बदल सकता है। Mind Control (मनो-नियंत्रण) यह पवित्र मार्ग की बात नहीं है। No one is authorised to control or change mind! (मन को नियंत्रित करने का या बदलने का किसी को भी हक नहीं)
जो अच्छा भक्त है, उसके मन में जो दोष है, जो भी गलती है; उसे सुधारने के लिए पुरी सहायता दी जाती है! यह सब करते हुए भी इन्सान के मन पर control (नियंत्रण) नहीं किया जाता। क्यों की अगर मन पर control (नियंत्रण) किया, तो वो इन्सान robot (यांत्रिक मानव) बन जायेगा!
हमारे जीवन का विकास करना है, इस लिए हमें खुद पढाई करके खुद पास होना है। योगिन्द्रसिंह का अच्छा article (लेख) आया है, कृपासिंधू में! How are we related to them? (हम उनसे कैसे जुड सकते है?) How are they related to us? (वो हमसे कैसे जुड सकते है?) (स्वस्तिक्षेम संवाद)

हरि ॐ
(अनिरुध्दाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम की संख्या बताई)

चक्रों के बीज मंत्र को देख रहे है।
मुलाधार चक्र
इस चक्र के चार दल है। उनके बीज मंत्र...
वं: - स्वाधिष्ठान चक्र का मुलबीज! इसके बारे में बाद में देखते है।
'शं'   'षं'
इनका उच्चारण जरुर कर सकते है! किसी भी क्रम से कर सकते है। सिर्फ चक्र को देखते हुए बोलें! और श्रध्दा, विश्वास के साथ बोलें! इसके सिर्फ कंपन से 'तिनों देह में उचित कंपन पैदा हो रहें है'
बाकी के बीजों को बोलने की जरुरत नहीं है।
इन बाकी 'शं' और 'सं'
'शं' शांती... 'शं' से 'शमन' होता है।
हमारे मन में शांती नहीं है! जो बेचैनी है, तो वह शांत नहीं होगा। बेचैनी शांत होगी! शमन याने दमन नहीं! संतुलित action (क्रिया), संतुलित विचार! 'शं' बीज ये पवित्रता से जुडा हुआ है। शिव नाम का अर्थ, 'सबसे पवित्र' हमेशा शांती प्रदान करता है; रुद्र स्वरुप होकर भी!
रुद्र स्वरुप, श्रध्दाहीनों के लिए है! और उसी का 'भद्र' स्वरुप, श्रध्दावानों के लिए है। उसकी हर मुर्ती, उसका हर चित्र, हर अवस्था simultaneously (समकालीन) रुद्र और भद्र भी है। यह भद्रता, याने 'मंगलकर्ता' जो अच्छा बनना चाहता है, जो अच्छा लेना चाहता है, अच्छा देना चाहता है; उसके लिए!
हम कैसे है, उसपर उसका स्वरुप निर्भर है। हमें उसके दोनो स्वरुप चाहिए! शिवजी हमें harm (नुकसान) करने वाले नहीं है। दोनो रुप हमारे लिए आवश्यक है। Equally (समांतर) उसका रुद्र स्वरुप हमारे स्थुल शरीर में, सारी बिमारियों का नाश करने के लिए है।
शेरनी, दुसरों के लिए भयानक होगी पर अपने बच्चों के लिए नहीं! यह ध्यान में रखें!!
अशुभ का नाश होना चाहिये, इसलिए दोनो रुप चाहिए!
रुद्र स्वरुप और भद्र स्वरुप; दोनो अलग अलग भी है और एक भी है!
हम अगर किसी की जिंदगी के साथ खिलवाड कर रहें हैं; तो ये चीज माँ को मंजुर नहीं! अगर गलती से हुआ, तो क्षमा मिलेगी।
लेकिन अगर जानबुझकर जहर घोल रहे है, तो रुद्र स्वरुप लेगा! जब तक वो दुसरे के जीवन में जहर घोलना बंद नहीं करता, तब तक क्षमा नहीं करता!
जो इन्सान दुसरों से तकलीफ मिलने के कारण आत्महत्या करता है; उसे अपना Revenge (बदला, सुड) लेने के लिए 'पिशाच्च योनि में जाने की permission (आज्ञा) है।

उसके पास बडा न्याय है। अपने पास जितना है, उतना ही खर्चा करो! दिखावे की बातों में नहीं आना! किसी को फोकट (मुफ्त) नहीं देना।
ऋण, वैर (बैर), हत्या में नहीं आना। माँ-बेटे; पिता-पती को दिया तो वो चलता है

ऋण से हत्या हो गयी! तो वैर (बैर) भी हो गया।
वो 'शिव' जब तक गुस्सा नहीं होता; तब तक बच जायेगा। किसी के जीवन के साथ खिलवाड मत करो। किसी का अच्छा कर सकते हो, तो करो! गलती हो गयी फिर भी!
ये 'शं' बीज, भद्र बीज! जो रुद्र का है, वो ही भद्र का है।
मेरी जिंदगी में कोई जहर ना घोलें, वैसे ही; मै भी किसी कि जिंदगी में जहर ना घोलूं!!
यह ध्यान करो!
अच्छे लोगों को तकलीफ कब आती है? जब उन्हे आधार देने के लिए कोई नहीं है, तभी
बुरे लोगों की जब सब ताकत, कम हो जाती है; तब सारे दुख उनपर फेंके जाते है! रोने के लिए कभी कंधा भी देने के लिए कोई नहीं होता! सिर्फ पैसे से कुछ नहीं होता!
ये 'शं' बीज, रुद्र और भद्र का है। हमें दोनो चाहिए! हम कोशिश करते रहें कि, हम किसी को ना फँसाये!!
हम भक्ती मार्ग पर है, तो ऐसा नहीं होना चाहिए; कि और कोई मुझे फँसाकर चला जायें। भक्ती से हमारी बुध्दी और तेज होनी चाहिए! I.Q. बढता है।
ये बीज हमारे मुलाधार चक्र में है। जहाँ से सबकुछ उत्पन्न होता है।
शिवजी, जो अंदर बैठा है, वो हमारा जहर पिने के लिए हमेशा तैय्यार होता है। हम किसी के जिंदगी में जहर घोलते है, मतलब वो जहर शिव जी को पिलाते है।
यह 'लं' में बाकी सब बीज आ जायेंगे।
किसी के मन में बहोत वासना उत्पन्न हुयी है!
Fr eg (उदाहरण के तौर पर) अगर किसी को भुख बहुत लगी है, तो ये 'शं' बीज 'लं' बीज; भुख कम करते है। किसी को भुख ही नहीं लगती! Normal (साधारण) भुख कि तरफ लायेंगे! जो विकार और वासनाएँ है, सारे षडरिपूं है, ये सारे षडरिपू मुलाधार चक्र से आते है। इस 'लं' बीज के अंदर 'शं' बीज आता है।
पुरे भाव के साथ, "ॐ लं" बोलोगे, तब सारे बाकी बीज जितने percentage (फिसदीं) में आवश्यक है! मुलाधार गणेश, अपने आप 'लं' बीज को प्रेरित करेंगे!
इसलिए भगवान पर faith (विश्वास) होना चाहिए!
हम लोग मुलाधार चक्र के 'शं' कार्य जो है... 'लं' बीज का, उसे जाने!! कि मैं किसी के जीवन में जहर नहीं घोलुँगा! और किसी को घोलने नहीं दुँगा। इससे जो फायदा मिले वो जरुर मिलेगा।
विश्वास बहुत महत्वपुर्ण काम करता है! सिर्फ भगवान के प्रती नहीं, हर रिश्ते में, हर काम में!
मेरे बच्चे किसी पे भरोसा नहीं रख सकते! लेकिन सब पर doubt (शक, संशय) करते फिरें, ऐसा भी ना हो!
बाहर 80% से ज्यादा खराब है। संस्था में 80% लोग अच्छे है। And I am proud of it (और मुझे इस पर गर्व है) खुद का भी सम्मान करना सिखों! मेरे बच्चों, 80% से उपर, ज्यादा लोग अच्छे है। मेरे सारे बच्चे अपने आप में भी improved (सुधारणा) है।
अगर हम माँ को दादी मानते है, तो ऐसी स्थिती में मेरी गलतियाँ सिर्फ 20% बाकी है। अभी श्री शब्द ध्यान योग करेंगे!
इस वसुंधरा पर सारे विघ्नों का नाश करनेवाला जो स्वामी है, वो गणेश है।
बाकी जो obstructions (अडचनें) आती है, उसके लिए 'मुलार्क गणेश' भी तैय्यार है।
इन्सान के लिए सबसे ज्यादा, 'मुलाधार चक्र' अहमियत रखता है।
मुलाधार चक्र हमारे लिए बहुत आवश्यक है।
आहार, विचार, सब कुछ इस चक्र के साथ जुडा हुआ है!
दुसरों के जीवन में जहर घोलना बंद करना है। गलती से हो गया हो तो सुधारने का प्रयास करें! और खुद के जीवन में भी घुलने नहीं देना। शिव जी, जो भी जहर आयेगा, वो पिते रहेंगे।

शब्दांकन
मिलिंदसिंह फणसे
हम सभी अंबज्ञ है।

Monday, April 4, 2016

गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली कथा

गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली
कथा

हरि ॐ
" गुढीपाडवा "
ज्या दिवसाची वाट पाहत,
श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे
धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस .
ज्या दिवसाची वाट पाहत,
भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका
सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस.
ज्या दिवसाची वाट पाहत,
चौदावर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे
संन्यासी जीवनव्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो
हा दिवस .
प.पू. अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या
प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा
सांगितली होती.

हरि ॐ
ज्याक्षणाची वाटपहात सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण
आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व
दिशांनी आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध
वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम ,माता
सीता, लक्ष्मणासह ,सुग्रीव आणि समस्त
वानार्सैनिकांसाहित परत आले होते. हनुमंत भक्तश्रेष्ठ
भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहचले होते.
राजमहालात पोहचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले.
श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले.
नंतर श्रीराम मातासीतेसह लक्ष्मण,भरत, आणि हनुमंत
अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. चौदा वर्षे
संयासाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध
रंगांनी नटलेली होती . विविध रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते
सजलेले होते .सर्व अयोध्या वासियांनी आपल्या लाडक्या
श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी रंगबेरंगी वस्त्रांची गुढी
दारात उभारली होती .
सर्व अयोध्या वासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पंचायतन
सुखावत होते, आशीर्वाद देत होते.
अयोध्येचे हे सौंदर्य न्याहाळताना लक्ष्मणाची नजर एका
गुढीवर गेली.जी गुढी फक्त साध्या,जुन्या वस्त्राची उभारली
होती . त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले ," बंधू ! ती
गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?"
त्यावर श्रीराम म्हणाले ,"चला आपण त्या घरात जाऊन
पाहूयात."
पंचायतन त्याघरी पोहचल्यावर त्या घरातील सर्वांना
अतिशय आनंद झाला . पंचायत्नाच्या स्वागतासाठी
सर्वांची एकाच लगबग उडाली . श्रीरामचंद्रा बरोबरील
सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले.सर्वांचे क्षेमकुशल
विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला ," फक्त आपल्या
घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली
आहे ?"
यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला " देवा,आपण येणार
म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. पण आमच्या
घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून
दुखी होतो . मनोमन तुमची प्रथांना करत होतो कि त्यांना
तुमचे दर्शन होवो.पण त्यांनी त्यांची अखेरची घटिका
ओळखली होती .त्यांनी घरातील सर्वांना जवळ बोलावून
घेतले व म्हणाले,' मला काही श्रीरामांचे दर्शन घेता येणार
नाही असे वाटते.माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक
आहेत . तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू
नका.त्याऐवजी श्रीरामचंद्राच्या स्वागतात आनंदाने
सहभागी व्हा..' 'माझी फक्त एकच इच्छा आहे ,तुम्ही
त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या
वस्त्राने उभारा , कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले
होते तेव्हा त्यांची चरण धूळ या वस्त्रामध्ये मला
'कृपाशीर्वाद' म्हणून मिळाली होती.' "
सर्वांचे डोळे पाण्याने भरले .श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव
करुणा दाटली होती. ते गुढी जवळ गेले व त्यांनी आपल्या
कंबरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या
गुधीवरील ते जुने वस्त्र आपल्या कंबरेला बांधले.तो क्षण
सर्वांच्या मनाला मोहून गेला.तो क्षण श्रीरामचंद्राची
त्यांच्या भक्तांबध्ल असणार्या प्रेमाची साक्ष देत होता.
त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. आता सर्व
वानार्सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार
करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता.त्यानुसार
सर्वाना भेटवस्तू, त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी
हनुमंताची वेळ आली .आता माता सीतेला प्रश्न पडला कि
हनुमंताला कोणती भेट द्यावी? त्यावर त्यांनी हनुमंतालाच
विचारले,"तात! आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी?
"त्यावर हनुमंत म्हणाले , "माते, श्रीरामांनी मला सर्व काही
दिले आहे . पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा
मोह होतोय, 'श्रीरामांनी त्यांच्या कंबरे भोवती
बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा.' "
त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामांच्या कंबरेचे
काढले आणि हनुमंताच्या कंबरेला बांधले.
भक्तांच्या प्रेमा पेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या
श्रीरामांचा आणि हनुमंताचा सर्वांनी जयजयकार केला.
"प.पू .बापू त्यावेळी म्हणाले होते कि," ही कथा जो कुणी
गुढी पाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल
ते मी आता सांगणार नाही."
!! हरिओम !!

सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या अनिरुद्धमय
शुभेच्छा !!